AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किरकोळ वाद टोकाला गेला, मित्रांनीच मित्राचे अपहरण केले मग…

किरकोळ कारणातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन मित्राने आपल्या अन्य दोन मित्रांसोबत मिळून तरुणचा काटा काढल्याची घटना सांगवलीत उघडकीस आली आहे. तरुणाची हत्या केल्यानंतर मृतदेह जाळला.

किरकोळ वाद टोकाला गेला, मित्रांनीच मित्राचे अपहरण केले मग...
किरकोळ कारणातून मित्रांनीच केली मित्राची हत्याImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 06, 2023 | 4:35 PM
Share

सांगली / शंकर देवकुळे : किरकोळ कारणातून झालेल्या भांडणाचा राग धरून मित्रांनीच आपल्या मित्राचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना सांगलीत घडली आहे. ओंकार रकटे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह जाळून टाकला. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बावची या ठिकाणी धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तिघांना अटक केली आहे. सम्मेद सावळवाडे, भरत काटकर आणि राकेश हालुंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हत्या करुन मृतदेह जाळला

सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या बावची येथील ओंकार रकटे या तरुणाचे अपहरण करून हत्या करत त्याचा मृतदेह जाळला. मृतदेह जाळल्यानंतर हाडे नदीत टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ओंकार याच्या मित्रांनीच ही हत्या केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी आष्टा पोलिसांनी तिघा मित्रांना अटक केली आहे.

किरकोळ भांडणाचा रागातून केले कृत्य

काही दिवसांपूर्वी सम्मेद सावळवाडे आणि ओंकार रकटे याच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झालं होतं. या भांडणाचा राग सम्मेद याच्या मनात खदखदत होता. यातून सम्मेदने आपल्या मित्रांच्या मदतीने ओंकार रकटे याचे अपहरण केलं. त्यानंतर ओंकार याला मारहाण करत त्याचा गळा आवळून खून केला.

आष्टा पोलिसांकडून तिघांना अटक

खुनाच्या घटनेनंतर ओंकार याचा मृतदेह स्मशानभूमीत नेऊन जाळून टाकला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची राख आणि हाडे पोत्यात भरून कृष्णा नदीमध्ये टाकून देण्यात आली. पोलीस चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करत, त्यांना अटक केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?