AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षकांना तक्रार केली म्हणून अल्पवयीन विद्यार्थ्याचा दोघा भावांवर कोयत्याने हल्ला, कुठे घडली घटना?

शाळेतल्या वादातून शाळकरी मुलाने शाळेबाहेर जे केलं त्याने जिल्हा हादरला आहे. विद्यार्थ्याने जे कृत्य केलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल.

शिक्षकांना तक्रार केली म्हणून अल्पवयीन विद्यार्थ्याचा दोघा भावांवर कोयत्याने हल्ला, कुठे घडली घटना?
साताऱ्यात क्षुल्लक वादातून शाळकरी विद्यार्थ्यांवर हल्लाImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 15, 2023 | 1:59 PM
Share

सातारा : सातारा जिल्ह्यात एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकांना नाव सांगितल्याच्या रागातून एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला केला. खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्या दोघेही विद्यार्थी जखमी झाले आहेत. एका विद्यार्थ्यावर पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याला शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी विद्यार्थी हे सख्खे भाऊ आहेत. शाळकरी विद्यार्थ्याने उचलेले गुन्हेगारी पाऊल पाहता सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे.

काय घडलं नेमकं?

हे तिन्ही विद्यार्थी सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एका खासगी शाळेतील विद्यार्थी आहेत. हल्लेखोर विद्यार्थ्याची पीडितांनी शिक्षकांकडे काही कारणातून तक्रार केली होती. यामुळे मुलगा संतापला होता. याच राग मनात ठेवून संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर 6 वाजण्याच्या सुमारास आरोपीने दोघा भावाने अडवले. यानंतर त्यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला.

दोन्ही जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु

या हल्ल्यात दोघेही विद्यार्थी जखमी झाले आहेत. एका विद्यार्थ्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. त्याला पुणे येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर दुसऱ्या जखमीवर शिरवळ येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर काही वेळातच शिरवळ पोलिसांनी हल्लेखोर विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...