AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नात रसगुल्ल्याचा वाद टोकाला गेला, वऱ्हाड्यांनी नवरीच्या काकालाच संपवला !

लग्न मुहूर्तावर पार पडले आणि वधू-वर एकमेकांसोबत विवाह बंधनात अडकले. त्यानंतर भोजन समारंभही आटोपत आला होता. यादरम्यान लग्नमंडपातील रसगुल्ल्याची बादली दोघे तरुण पळवून नेत असल्याचे वधूच्या काकांच्या लक्षात आले.

लग्नात रसगुल्ल्याचा वाद टोकाला गेला, वऱ्हाड्यांनी नवरीच्या काकालाच संपवला !
रसगुल्ल्यावरुन लग्नात हाणामारीत एकाचा मृत्यूImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Feb 18, 2023 | 6:13 PM
Share

लखनौ : सध्या सर्वत्र लग्नसराईची जोरदार धामधूम सुरू आहे. याचदरम्यान उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात झालेल्या एका लग्न सोहळ्यामध्ये आनंदावर विरजण पडले आणि घडलेल्या हत्याकांडाने लग्न सोहळ्यावर शोककळा पसरली. दोन तरुण लग्न मंडपातून रसगुल्ल्याची बादली घेऊन पळत होते, त्यावेळी वधूच्या काकाने त्यांना रोखले. त्यावरुन वाद होऊन त्याचे पर्यावसान जोरदार हाणामारीत झाले. या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या वधूच्या काकाचा मृत्यू झाला. तसेच आणखी एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. भर लग्न मंडपात झालेल्या या राड्याने मैनपूर परिसरात खळबळ उडाली आहे. कुरावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिकापूर गावात ही घटना घडली. या घटनेचा स्थानिक पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.

वधूच्या काकाची वऱ्हाडातील अनेकांनी केली धुलाई

लग्न मुहूर्तावर पार पडले आणि वधू-वर एकमेकांसोबत विवाह बंधनात अडकले. त्यानंतर भोजन समारंभही आटोपत आला होता. यादरम्यान लग्नमंडपातील रसगुल्ल्याची बादली दोघे तरुण पळवून नेत असल्याचे वधूच्या काकांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच पुढे होऊन त्या दोघांना रोखले आणि बादली मंडपातून बाहेर घेऊन न जाण्याची तंबी दिली.

सर्वांसमोर अपमान केल्याने तरुण संतापले

सर्वांदेखत आपला अपमान झाला, या रागाने ते दोन तरुण संतापले. त्यांनी स्वतःची चूक मान्य न करता उलट वधूच्या काकाला बेदम मारहाण सुरू केली. विशेष म्हणजे हा वाद सुरू असताना त्यामागील कारण काय याचा अंदाज न घेताच वऱ्हाडातील इतर मंडळींनीही वधूच्या काकाची धुलाई केली. त्यात गंभीर दुखापत होऊन वधूच्या काकाचा मृत्यू झाला.

रणवीर सिंह असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते आपला मेहुणा रामकिशोरसोबत साडूच्या मुलीच्या लग्नाला हजर राहिले होते. रणवीर आणि रामकिशोर या दोघांनी लग्न मंडपामध्ये ज्या दोन तरुणांवर चोरीचा संशय घेतला, ते तरुण गावातीलच रहिवासी होते. त्यामुळे लग्न मंडपात वाद झाल्यानंतर अजय आणि रजत या दोन तरुणांच्या बाजूने गावकरी उभे राहिले.

वाद वाढत गेल्यानंतर तरुणांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या गावकऱ्यांनी वधूच्या काकाला बेदम मारहाण केली. मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या रामकिशोरवर सैफई येथील पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Follow Us
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MPSC Paper Case | कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल, सकाळपासूनच... हे काय घडलं?
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट...
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?