AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरचे लग्नाला नाही म्हणाले… प्रेमीयुगल गोव्यात गेले… नंतर जे काही घडलं ते ऐकून नातेवाईकांना धक्काच बसला…

घरच्यांचा विरोध पाहून दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता, मात्र गेल्या आठवड्यात ते रेल्वेने नाशिकहून गोव्याला गेले होते. तिथे त्यांनी लग्न न करता आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला होता.

घरचे लग्नाला नाही म्हणाले... प्रेमीयुगल गोव्यात गेले... नंतर जे काही घडलं ते ऐकून नातेवाईकांना धक्काच बसला...
Image Credit source: Google
| Updated on: Nov 03, 2022 | 8:49 PM
Share

नाशिक : प्रेमासाठी जान भी कुर्बान हे असं म्हणणारे आणि तसं वागणारे प्रेमी काही कामी नाहीत. याच वाक्याचा प्रत्यय नाशिक शहराला आला आहे. नाशिकमधील प्रेमीयुगल हे घरच्यांनी लग्नाला प्रखर विरोध गेल्याने पळून गेले होते. त्यांनी थेट गोवा गाठल्याचे समोर आले आहे. गोव्यात जाऊन लग्न करण्याचा निर्धार दोघांनी केला होता. मात्र गोव्यात गेल्यावर दोघांनी निर्णय बदलला. एका हॉटेलात रूम बूक केला त्यासाठी त्यांनी बनावट ओळखपत्र दिल्याची बाबही समोर आली आहे. त्यांनंतर प्रेमीयुगालांनी थेट आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला होता. त्यात दोघांनी विषप्राशन केले होते त्यात मुलाचा मृत्यू झाला असून मुलीची प्रकृती स्थिर आहे. गोव्यातील कोलवा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असून गोव्याचे पोलीस तपास करीत आहे. यामध्ये मृत्यू झालेला तरुण हा 21 वर्षांचा होता तर 22 वर्षांची तरुणी असून तिच्यावर गोव्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान ही घटना घडल्यानंतर नाशिकमधील प्रेमी युगलांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला असून याबाबत कल्पना दिली आहे.

नाशिक पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली असून मुलाचा मृतदेह घेण्यासाठी त्याचे नातेवाईक गोव्यात दाखल झाले आहे.

याशिवाय मुलीचे नातेवाईक देखील मुलीवर ज्या रुग्णालयात दाखल आहे तिथे पोहचले आहेत. कोलवा पोलीसांनी याबाबत याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक येथील गौरव यादव या 21 वर्षीय तरुणाचे एका 22 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र या संबंधांना दोघांच्या घरच्यांनी कडाडून विरोध केला होता.

घरच्यांचा विरोध पाहून दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता, मात्र गेल्या आठवड्यात ते रेल्वेने नाशिकहून गोव्याला गेले होते. तिथे त्यांनी लग्न न करता आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला होता.

मुलाच्या मृत्यूनंतर तरुणीने गोव्यातील कोलवा पोलिसांना जबाबात ही माहिती दिली असून कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमेनो कोस्टा हे तपास करीत आहे.

या दोघांनी आपले नाव बदलत गोव्यातील हॉटेलमध्ये राहत होते. तरुणाने किशोर अय्यर या बनावट नावाने दक्षिण गोव्यातील कोलवा येथील एका गेस्ट हाऊसमध्ये राहण्यासाठी पुरावा म्हणून कागदपत्रे दिले आहेत.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.