AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरचे लग्नाला नाही म्हणाले… प्रेमीयुगल गोव्यात गेले… नंतर जे काही घडलं ते ऐकून नातेवाईकांना धक्काच बसला…

घरच्यांचा विरोध पाहून दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता, मात्र गेल्या आठवड्यात ते रेल्वेने नाशिकहून गोव्याला गेले होते. तिथे त्यांनी लग्न न करता आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला होता.

घरचे लग्नाला नाही म्हणाले... प्रेमीयुगल गोव्यात गेले... नंतर जे काही घडलं ते ऐकून नातेवाईकांना धक्काच बसला...
Image Credit source: Google
| Updated on: Nov 03, 2022 | 8:49 PM
Share

नाशिक : प्रेमासाठी जान भी कुर्बान हे असं म्हणणारे आणि तसं वागणारे प्रेमी काही कामी नाहीत. याच वाक्याचा प्रत्यय नाशिक शहराला आला आहे. नाशिकमधील प्रेमीयुगल हे घरच्यांनी लग्नाला प्रखर विरोध गेल्याने पळून गेले होते. त्यांनी थेट गोवा गाठल्याचे समोर आले आहे. गोव्यात जाऊन लग्न करण्याचा निर्धार दोघांनी केला होता. मात्र गोव्यात गेल्यावर दोघांनी निर्णय बदलला. एका हॉटेलात रूम बूक केला त्यासाठी त्यांनी बनावट ओळखपत्र दिल्याची बाबही समोर आली आहे. त्यांनंतर प्रेमीयुगालांनी थेट आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला होता. त्यात दोघांनी विषप्राशन केले होते त्यात मुलाचा मृत्यू झाला असून मुलीची प्रकृती स्थिर आहे. गोव्यातील कोलवा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असून गोव्याचे पोलीस तपास करीत आहे. यामध्ये मृत्यू झालेला तरुण हा 21 वर्षांचा होता तर 22 वर्षांची तरुणी असून तिच्यावर गोव्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्यान ही घटना घडल्यानंतर नाशिकमधील प्रेमी युगलांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला असून याबाबत कल्पना दिली आहे.

नाशिक पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली असून मुलाचा मृतदेह घेण्यासाठी त्याचे नातेवाईक गोव्यात दाखल झाले आहे.

याशिवाय मुलीचे नातेवाईक देखील मुलीवर ज्या रुग्णालयात दाखल आहे तिथे पोहचले आहेत. कोलवा पोलीसांनी याबाबत याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक येथील गौरव यादव या 21 वर्षीय तरुणाचे एका 22 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र या संबंधांना दोघांच्या घरच्यांनी कडाडून विरोध केला होता.

घरच्यांचा विरोध पाहून दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता, मात्र गेल्या आठवड्यात ते रेल्वेने नाशिकहून गोव्याला गेले होते. तिथे त्यांनी लग्न न करता आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला होता.

मुलाच्या मृत्यूनंतर तरुणीने गोव्यातील कोलवा पोलिसांना जबाबात ही माहिती दिली असून कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमेनो कोस्टा हे तपास करीत आहे.

या दोघांनी आपले नाव बदलत गोव्यातील हॉटेलमध्ये राहत होते. तरुणाने किशोर अय्यर या बनावट नावाने दक्षिण गोव्यातील कोलवा येथील एका गेस्ट हाऊसमध्ये राहण्यासाठी पुरावा म्हणून कागदपत्रे दिले आहेत.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.