AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक : अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठचे अण्णा साहेब मोरे यांच्या अडचणीत वाढ; आर्थिक शोषणाच्या चौकशी मागणी

जिल्हाधिकारी आणि धर्मदाय आयुक्त यासंदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील लोकांसह भाविकांचे लक्ष लागून राहीलेले आहे.

नाशिक : अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठचे अण्णा साहेब मोरे यांच्या अडचणीत वाढ; आर्थिक शोषणाच्या चौकशी मागणी
दिंडोरी येथील प्रसिद्ध स्वामी समर्थ केंद्रImage Credit source: tv9
| Updated on: May 17, 2022 | 8:19 PM
Share

नाशिकः जिल्ह्यातील दिंडोरी येथील प्रसिद्ध स्वामी समर्थ केंद्राचे (Swami Samarth Center) प्रमुख श्रीराम खंडेराव उर्फ गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे (Annasaheb More)यांच्यावर तब्बल 50 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वामी समर्थ केंद्राचे धुळे येथील सेवेकरी अमर पाटील यांनी हे आरोप केले आहेत. तर अमर पाटील यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या घटनेमुळे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रात खळबळ माजली आहे. अण्णासाहेब मोरे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सचिन पाटील यांनी केली आहे. यादरम्यान आता अण्णासाहेब मोरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून त्यांनी केलेल्या आर्थिक शोषणाच्या चौकशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) केली आहे.

भोंदूगिरीचे प्रकार भक्तांच्या मनात

त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ ही एक प्रसिद्ध धर्मादाय संस्था आहे. देशभरातील भाविकांची संस्थेवर श्रद्धा आहे. श्रीराम खंडेराव ऊर्फ अण्णासाहेब हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. अण्णासाहेब यांनी इतर सदस्यांशी संगनमत साधून 50 कोटी 68 लाख 69 हजार 221 रुपयांचा अपहार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचदरम्यान आता अध्यात्माच्या नावाखाली जादूटोणा, करणी, चमत्कार आणि भोंदूगिरीचे प्रकार भक्तांच्या मनात बिंबवत असल्याचा आरोप अनिसकडून करण्यात आला असून तसा दावा ही करण्यात आला आहे.

त्याचबरोबर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठात धार्मिक श्रद्धा, अज्ञानाच्या नावाखाली भाविकांचे आर्थिक शोषण होत असल्याचा अनिस ला संशय आहे. त्यामुळे या केंद्रावर कठोरात कठोर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अनिसकडून करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी आणि धर्मदाय आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ ही एक प्रसिद्ध धर्मादाय संस्था आहे. ज्यात अण्णासाहेब यांनी इतर सदस्यांशी संगनमत साधून 50 कोटी 68 लाख 69 हजार 221 रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार आहे. तर अध्यात्माच्या नावाखाली जादूटोणा, करणी, चमत्कार आणि भोंदूगिरीचे प्रकार भक्तांच्या मनात बिंबवत असल्याचा आरोप अनिसकडून करण्यात आला असून तसा दावा ही करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि धर्मदाय आयुक्त यासंदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील लोकांसह भाविकांचे लक्ष लागून राहीलेले आहे.

Follow Us
राज्यसभा निवडणूक बिनविरोध, 7 उमेदवार थेट खासदार! अडसूळ मात्र नाराज
राज्यसभा निवडणूक बिनविरोध, 7 उमेदवार थेट खासदार! अडसूळ मात्र नाराज.
बिहारमध्ये राजकीय भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्री भाजपचा?
बिहारमध्ये राजकीय भूकंप! नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्री भाजपचा?.
सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंचे मानले आभार; काय आहे कारण?
सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंचे मानले आभार; काय आहे कारण?.
टीम इंडिया चौथ्यांद टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये!
टीम इंडिया चौथ्यांद टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये!.
जनतेचा, मित्रपक्षांचा मनापासून ऋणी; शरद पवारांचं ट्विट
जनतेचा, मित्रपक्षांचा मनापासून ऋणी; शरद पवारांचं ट्विट.
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.