
तुम्ही आतापर्यंत लुटेरी दुल्हनच्या अनेक बातम्या वाचल्या असतील. अनेक महिला लग्न करतात आणि पतीच्या घरी जाताच सोनं नाणं घेऊन पसार होतात. मात्र आता फक्त महिलाच नव्हे तर पुरुषही लग्नाच्या नावाखाली फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. लखनऊमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीली आधीच दोन बायका आहेत. तरीही त्याने तिसरे लग्न केले. त्यानंतर त्याने असे काही कांड केले की, आता पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना महानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. काळापूर्वी दिवसांपूर्वी एका महिला शिक्षिकेची इंस्टाग्रामवर एका तरुणाशी मैत्री झाली. त्या तरुणाने महिलेला गोड बोलून फसवले. तिचा नंबर घेतला. दोघेही एकमेकांशी बोलू लागले, पुढे बरेच दिवस हा प्रकार सुरु झाला. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
एक दिवस त्या तरुणाने महिला शिक्षिकेकडे लग्नाची मागणी घातली. त्या मुलीलाही तो तरुण खूप आवडला होता, त्यामुळे तिने लग्नाला होकार दिला. दोघे आर्य समाज मंदिरात गेले आणि लग्न केले. लग्नानंतर हा तरूण त्या महिलेच्या घरी राहू लागला. मात्र तिला माहित नव्हते की पुढे काय होणार आहे. या तरुणीने तिच्या घरातून एक-एक करून दोन स्कूटी चोरल्या आणि तो पळून गेला.
हा तरुण पळून गेल्याचे महिलेच्या लक्षात आले तेव्हा तिने त्याला फोन केला. मात्र त्याचा मोबाईल बंद होता. महिलेने त्याचा शोध सुरू केला. त्यावेळी तिला कळले की हा व्यक्ती बनावट आहे. त्याने तिला फसवून तिच्याशी लग्न केले आहे. या व्यक्तीला आधीच दोन बायका आणि तीन मुले आहेत. या व्यक्तीचा हेतू या महिलेल्या घरात चोरी करणे हा होता.
हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर महिला शिक्षिका रडत रडत पोलिस स्टेशनमध्ये गेली. तिले पोलिसांना त्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर कसे फसवले आणि तिच्याशी लग्न केले हे सांगितले. साहेब! त्याने मला फसवले आहे. मला त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी असं तिने म्हटलं, त्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.
या फसवणूकीच्या घटनेनंतर महानगर पोलिस ठाण्याने गुन्हा दाखल झाला असून आरोपी वराचा शोध सुरु आहे. पोलिसांनी सांगितले की, आम्ही लवकरच आरोपीला अटक करू. त्याने आणखी किती महिलांना फसवले आहे याचा देखील शोध सुरु आहे.