AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावीच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ, विद्यार्थी शोधतायेत मोबाईल, नंतर पोलिस म्हणतात…

विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करीत असताना काहीवेळेला माहितीसाठी मोबाईलचा उपयोग होत होता. परंतु मोबाईल चोरीला गेल्यामुळे मोठा खोळंबा झाला आहे.

बारावीच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ, विद्यार्थी शोधतायेत मोबाईल, नंतर पोलिस म्हणतात...
12th examImage Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 24, 2023 | 9:22 AM
Share

नाशिक : राज्यात सगळीकडे बारावीची परीक्षा (12th exam) सुरु आहे. विद्यार्थ्यांचे (student tention) काही पेपर सुध्दा झाले आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला गेल्यामुळे सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे. ही घटना नाशिक (nashik) जिल्ह्यात घडली आहे. मोबाईल चोरीला गेल्यामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे प्रकरण विद्यार्थ्यांनी सुरुवातीला शाळा प्रशासनाच्या कानावर घातलं, त्यानंतर काहीचं उत्तर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे प्रकरण पोलिसांच्या कानावर घातलं आहे. सध्या विद्यार्थ्यांचे मोबाईल शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.

11 विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला

राज्यात सर्वत्र बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहे. मात्र नाशिकमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान काहीसा मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना घडली. नाशिकच्या नाशिकरोड येथील के. जे. मेहता हायस्कूल तसेच बिटको हायस्कूल मधील बारावीचे विद्यार्थी परीक्षा देत असताना अज्ञात व्यक्तीने 11 विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरल्याची घटना घडली. चोरीला गेलेले मोबाईल दोन हजार ते दहा हजार रुपये किमतीच्या दरम्यानचे आहेत. त्या मोबाईल चोरीमुळे आता शाळा प्रशासन आणि पोलीस यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. उपनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

विद्यार्थ्यांचा मोठा खोळंबा

नाशिकमध्ये दोन परीक्षा केंद्रावरुन विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला गेल्यामुळे पालकांनी सुध्दा नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त असल्यामुळे चोरीचं प्रकरण घडल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करीत असताना काहीवेळेला माहितीसाठी मोबाईलचा उपयोग होत होता. परंतु मोबाईल चोरीला गेल्यामुळे मोठा खोळंबा झाला आहे.

पोलिस परिसरातील सीसीटीव्ही आणि शाळेच्या आवारातील सीसीटिव्हीची चौकशी करीत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.