AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावीच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ, विद्यार्थी शोधतायेत मोबाईल, नंतर पोलिस म्हणतात…

विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करीत असताना काहीवेळेला माहितीसाठी मोबाईलचा उपयोग होत होता. परंतु मोबाईल चोरीला गेल्यामुळे मोठा खोळंबा झाला आहे.

बारावीच्या परीक्षा केंद्रावर गोंधळ, विद्यार्थी शोधतायेत मोबाईल, नंतर पोलिस म्हणतात...
12th examImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 24, 2023 | 9:22 AM
Share

नाशिक : राज्यात सगळीकडे बारावीची परीक्षा (12th exam) सुरु आहे. विद्यार्थ्यांचे (student tention) काही पेपर सुध्दा झाले आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला गेल्यामुळे सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे. ही घटना नाशिक (nashik) जिल्ह्यात घडली आहे. मोबाईल चोरीला गेल्यामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे प्रकरण विद्यार्थ्यांनी सुरुवातीला शाळा प्रशासनाच्या कानावर घातलं, त्यानंतर काहीचं उत्तर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी हे प्रकरण पोलिसांच्या कानावर घातलं आहे. सध्या विद्यार्थ्यांचे मोबाईल शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.

11 विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला

राज्यात सर्वत्र बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहे. मात्र नाशिकमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान काहीसा मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना घडली. नाशिकच्या नाशिकरोड येथील के. जे. मेहता हायस्कूल तसेच बिटको हायस्कूल मधील बारावीचे विद्यार्थी परीक्षा देत असताना अज्ञात व्यक्तीने 11 विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरल्याची घटना घडली. चोरीला गेलेले मोबाईल दोन हजार ते दहा हजार रुपये किमतीच्या दरम्यानचे आहेत. त्या मोबाईल चोरीमुळे आता शाळा प्रशासन आणि पोलीस यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. उपनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

विद्यार्थ्यांचा मोठा खोळंबा

नाशिकमध्ये दोन परीक्षा केंद्रावरुन विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरीला गेल्यामुळे पालकांनी सुध्दा नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त असल्यामुळे चोरीचं प्रकरण घडल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करीत असताना काहीवेळेला माहितीसाठी मोबाईलचा उपयोग होत होता. परंतु मोबाईल चोरीला गेल्यामुळे मोठा खोळंबा झाला आहे.

पोलिस परिसरातील सीसीटीव्ही आणि शाळेच्या आवारातील सीसीटिव्हीची चौकशी करीत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Follow Us
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप