AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक नवरा, दोन बायका, दोघी नवऱ्यासोबत राहण्यासाठी बेचैन, अखेर कोर्टाने दिला असा आदेश

कोर्टाच्या निर्णयामुळे दोघीपण खुश. त्या 15 वर्षात खटला सुरु असताना, व्यक्तीने दुसरं लग्न केलं. त्या विवाहापासून त्याला दोन मुलं आहेत. त्यांना नवऱ्याला आपल्यापासून दूर होऊ द्यायच नव्हतं.

एक नवरा, दोन बायका, दोघी नवऱ्यासोबत राहण्यासाठी बेचैन, अखेर कोर्टाने दिला असा आदेश
how will husband live with two wives
| Updated on: Aug 25, 2023 | 1:39 PM
Share

भोपाळ : एका व्यक्तीने दोन लग्न केली. दोन्ही बायकांना नवऱ्यासोबतच रहायच होतं. त्यांना नवऱ्याला आपल्यापासून दूर होऊ द्यायच नव्हतं. त्यावरुन त्यांच्यात भांडण सुरु होती. अखेर हे प्रकरण परामर्श न्यायालय गेलं. त्यात न्यायालयाने दोघींना समान न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. घटिया येथे राहणाऱ्या व्यक्तीने 15 वर्षांपूर्वी बामोरा येथे राहणाऱ्या महिलेबरोबर लग्न केलं. काही काळापर्यंत पती-पत्नीमध्ये सगळं काही सुरळीत सुरु होतं.

त्यांना एक मुलगाही झाला. हळूहळू पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले. हा वाद न्यायालयात पोहोचला. न्यायालयात या प्रकरणात निकाल लागायला 15 वर्ष लागली. त्या व्यक्तीला आपल्या पत्नीसोबतच रहाव लागेल, असा कोर्टाने आदेश दिला. मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील हे प्रकरण आहे.

दोघींना नवरा हवा होता, पण….

न्यायालयाने त्या व्यक्तीला पत्नीसोबत राहण्याचे आदेश दिले. पण त्या 15 वर्षात खटला सुरु असताना, त्या व्यक्तीने दुसरं लग्न केलं. त्या विवाहापासून त्याला दोन मुलं आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर पहिली पत्नी त्या व्यक्तीसोबत रहायला त्याच्या घरी गेली. यामुळे त्याच्या संसारात वादळ निर्माण झालं. कारण दोघींना नवरा हवा होता. पण त्यांना एकत्र रहायच नव्हतं. त्यावरुन पुन्हा वाद झाला. त्याची दुसरी बायको नवऱ्याला सोडून उज्जैन येथे आपल्या माहेरी निघून गेली. न्यायालयाचा आदेश काय?

त्या व्यक्तीच्या दुसऱ्या पत्नीने परामर्श केंद्रात तक्रार दाखल केली होती. पती सोबत राहण्यासाठी तिने ही तक्रार केली होती. परामर्श केंद्राने त्या व्यक्तीला आणि त्याच्या दोन्ही बायकांना बोलवून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही बायका ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. अखेर परिवार परामर्श न्यायालयाने एक निर्णय दिला. त्यामध्ये पतीला पहिले 15 दिवस पहिल्या पत्नीसोबत आणि नंतरचे 15 दिवस दुसऱ्या पत्नी सोबत रहाण्याचा आदेश दिला.

Follow Us
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली