AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरळीतील समुद्रात पाच मुले बुडाली; दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर

वरळीतील कोळीवाडा येथे पाच मुले दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहण्यास गेली होती. ही पाचही मुले समुद्रात वाहून गेली.

वरळीतील समुद्रात पाच मुले बुडाली; दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर
रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमार बोट बुडालीImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Nov 18, 2022 | 9:15 PM
Share

मुंबई : वरळी कोळीवाड्याजवळ समुद्रात पाच मुले वाहून गेल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. या पाच जणांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून खासगी आणि केईएम रुग्णालयात दाखल केले. यामधील हिंदुजा रुग्णालयात दाखल केलेल्या 8 वर्षीय मुलाचा आणि 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर इतर तीन मुलांवर खाजगी आणि केएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयात भेट देत उपचार सुरू असेलेल्या मुलांची विचारपूस केली.

दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली घटना

वरळीतील कोळीवाडा येथे पाच मुले दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहण्यास गेली होती. ही पाचही मुले समुद्रात वाहून गेली. मुले वाहून जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मुंबई अग्निशमन दल पोहोचण्याआधीच त्यांना समुद्रातून बाहेर काढले.

दोन मुलांचा मृत्यू

स्थानिक नागरिकांनी या मुलांना खासगी वाहनांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र यावेळी दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर वाहून गेलेल्या अन्य तीन मुलांवर केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मुलीच्या प्रकृतीची माहिती उपलब्ध झालेली नाही.

आदित्य ठाकरेंनी घेतली पीडित कुटुंबांची भेट

10 वर्षाचा मुलगा आणि 14 वर्षाच्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून मुलाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही सर्व मुलं वरळी परिसरातील असल्यामुळे स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांनी या मुलांच्या कुटुंबियांना भेट देत जखमी मुलांच्या कुटुंबियाची विचारपूस केली.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.