AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरळीतील समुद्रात पाच मुले बुडाली; दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर

वरळीतील कोळीवाडा येथे पाच मुले दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहण्यास गेली होती. ही पाचही मुले समुद्रात वाहून गेली.

वरळीतील समुद्रात पाच मुले बुडाली; दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर
रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमार बोट बुडालीImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Nov 18, 2022 | 9:15 PM
Share

मुंबई : वरळी कोळीवाड्याजवळ समुद्रात पाच मुले वाहून गेल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. या पाच जणांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून खासगी आणि केईएम रुग्णालयात दाखल केले. यामधील हिंदुजा रुग्णालयात दाखल केलेल्या 8 वर्षीय मुलाचा आणि 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर इतर तीन मुलांवर खाजगी आणि केएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयात भेट देत उपचार सुरू असेलेल्या मुलांची विचारपूस केली.

दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली घटना

वरळीतील कोळीवाडा येथे पाच मुले दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहण्यास गेली होती. ही पाचही मुले समुद्रात वाहून गेली. मुले वाहून जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मुंबई अग्निशमन दल पोहोचण्याआधीच त्यांना समुद्रातून बाहेर काढले.

दोन मुलांचा मृत्यू

स्थानिक नागरिकांनी या मुलांना खासगी वाहनांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र यावेळी दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर वाहून गेलेल्या अन्य तीन मुलांवर केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मुलीच्या प्रकृतीची माहिती उपलब्ध झालेली नाही.

आदित्य ठाकरेंनी घेतली पीडित कुटुंबांची भेट

10 वर्षाचा मुलगा आणि 14 वर्षाच्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून मुलाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही सर्व मुलं वरळी परिसरातील असल्यामुळे स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांनी या मुलांच्या कुटुंबियांना भेट देत जखमी मुलांच्या कुटुंबियाची विचारपूस केली.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.