AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबरनाथमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू

राज्यात गणेशोत्सवाचा उत्सव सुरु आहे. मात्र या उत्साहादरम्यान ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातून एक दुखद बातमी समोर आली आहे. अंबरनाथमध्ये आज (12 सप्टेंबर) संध्याकाळी रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झाला.

अंबरनाथमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू
अंबरनाथमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यू
| Edited By: Chetan Patil | Updated on: Sep 12, 2021 | 10:28 PM
Share

अंबरनाथ (ठाणे) : राज्यात गणेशोत्सवाचा उत्सव सुरु आहे. मात्र या उत्साहादरम्यान ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातून एक दुखद बातमी समोर आली आहे. अंबरनाथमध्ये आज (12 सप्टेंबर) संध्याकाळी रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतक चारही जण उल्हासनगरचे असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल

अंबरनाथच्या पालेगाव भागात संबंधित घटना घडली. या अपघातात काहीजण जखमी असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे. मृतक आणि जखमी अशा सर्वांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनातील नागरिक गणेश विसर्जनासाठी आल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या माहितीला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

नालासोपाऱ्यात भरधाव डंपरने दोघांना उडवले, अपघातात तरुणांचा जागीच मृत्यू

भरधाव डंपरने उडवल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क येथे 6 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली होती. रोहित मिश्रा (24) आणि विनय तिवारी(25) अशी मयत तरुणांची नावे आहेत. हे दोघेही उत्तर प्रदेशातील भधोईया जिल्ह्यातील मूळचे रहिवासी आहेत. हे दोघेही नोकरीच्या शोधात मुंबईत आले होते. याप्रकरणी डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

नोकरीच्या शोधात मयत तरुण आले होते मुंबईला

रोहित आणि विनय मुंबईहून नालासोपाऱ्यात आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क रस्त्यावरुन आपल्या दुचाकीवरुन जात होते. यावेळी युटर्न घेताना त्यांच्या दुचाकीला डंपरने उडवले. या अपघातात या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी तुळिंज पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करीत चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. कोरोनाच्या काळात नोकरी, काम धंदा नाही. शेवटी कामाच्या शोधात मुंबईला आले आणि अपघातात जीव गमावून बसल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

चंद्रपूरमध्ये मोबाईलच्या नादात शिक्षकाने जीव गमावल्याची दुर्दैवी घटना

दुसरीकडे मोबाईल हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, या मोबाईल वापराचे अनेक तोटे आणि दुष्परिणामही दिसून येत आहेत. 5 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यात मोबाईल बोलण्याच्या नादात एका शिक्षकाने आपला जीव गमावल्याची घटना मूल शहरातील पंचशील नगर भागात घडली आहे. चिरकुटा खोब्रागडे असं मृत शिक्षकाचं नाव आहे. खोब्रागडे हे रात्री कानात हेडफोन लावून मोबाईलवर चालत असताना रेल्वेचा धक्का बसल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे मूल शहरात हळहळ व्यक्त होतेय.

चिरकुटा खोब्रागडे हे रात्री जेवण झाल्यानंतर घराशेजारी असलेल्या रेल्वे रुळावर फिरायला गेले होते. कानात हेडफोन असल्यामुळे त्यांना रेल्वेचा आवाज आला नाही. गोंदियाकडून बल्लारपूरकडे जाणाऱ्या मालगाडीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत खोब्रागडे हे दूर फेकले गेले. त्यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झालाय.

हेही वाचा :

नेमकं असं काय घडलं ज्याने बँक ऑफ बडोद्याच्या महिला मॅनेजरला गळफास घ्यावा लागला, पतीला बेड्या, हत्या की आत्महत्या?

ओढ्यात आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू, भाऊ थोडक्यात बचावला

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट...

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?