AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaipur-Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरण, तीनपैकी दोन प्रवाशांची ओळख पटली !

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये झालेल्या गोळीबारात तीन निष्पाप प्रवाशांचा हकनाक बळी गेला. यापैकी दोघांची ओळख पटवण्यास यश आले आहे.

Jaipur-Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरण, तीनपैकी दोन प्रवाशांची ओळख पटली !
गोळीबारातील दोन मृत प्रवाशांची ओळख पटलीImage Credit source: TV9
| Updated on: Jul 31, 2023 | 3:57 PM
Share

गोविंद ठाकूर, विजय गायकवाड, टीव्ही 9 मराठी मुंबई / 31 जुलै 2023 : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आज पहाटेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात एका आरपीएफच्या एएसआयसह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या तीन प्रवाशांपैकी दोघांची ओळख पटवण्यास पोलिसांना यश आले आहे. कादर भानपुरावाला आणि असगर अशी दोघांची नावे आहेत. कादर हे नालासोपारा येथील रहिवासी आहेत, तर असगर हे मूळचे बिहारमधील रहिवासी आहेत. गोळीबारात मृत्यू झाल्याची बातमी कळताच दोघांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नातेवाईक करत आहेत.

कादर पुनावाला नालासोपारा येथील रहिवासी

कादर पुनावाला हे नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील तेज प्रतिमा इमारतीत आपल्या कुटुंबासह राहतात. कादर हे मोहरमनिमित्त जयपूरला नातेवाईकाकडे गेले होते. तेथून जयपूर-मुंबई एक्सप्रेसने मुंबईला परतत असतानाच ही घटना घडली. विशेष म्हणजे काही वेळात ते आपल्या इच्छित स्थानकाजवळ पोहचणार इतक्यातही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कादर यांच्या कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना धक्का बसला. कुटुंबीयांनी तात्काळ शताब्दी रुग्णालयाकडे धाव घेतली.

असगर कामाच्या शोधात मुंबईकडे निघाला अन्…

दुसरा मयत असगर हा मूळचा बिहारमधील मधुबनी येथील असून, कामाच्या शोधात तो जयपूरहून मुंबईला येत होते. असगर यांना चार मुलं आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कामानिमित्त ते मुंबईत येत होते. आरोपीने असगरवर चार गोळ्या झाडल्या. पोलिसांनी असगरच्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल करुन मृतदेहाची ओळख पटवली. यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. असगरच्या कुटुंबीयांनी आरोपीला कोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच असगरवर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्याची मागणी करत सरकारकडे नुकसान भरपाई मागितली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.