AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaipur-Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरण, तीनपैकी दोन प्रवाशांची ओळख पटली !

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये झालेल्या गोळीबारात तीन निष्पाप प्रवाशांचा हकनाक बळी गेला. यापैकी दोघांची ओळख पटवण्यास यश आले आहे.

Jaipur-Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबार प्रकरण, तीनपैकी दोन प्रवाशांची ओळख पटली !
गोळीबारातील दोन मृत प्रवाशांची ओळख पटलीImage Credit source: TV9
| Updated on: Jul 31, 2023 | 3:57 PM
Share

गोविंद ठाकूर, विजय गायकवाड, टीव्ही 9 मराठी मुंबई / 31 जुलै 2023 : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आज पहाटेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात एका आरपीएफच्या एएसआयसह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या तीन प्रवाशांपैकी दोघांची ओळख पटवण्यास पोलिसांना यश आले आहे. कादर भानपुरावाला आणि असगर अशी दोघांची नावे आहेत. कादर हे नालासोपारा येथील रहिवासी आहेत, तर असगर हे मूळचे बिहारमधील रहिवासी आहेत. गोळीबारात मृत्यू झाल्याची बातमी कळताच दोघांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नातेवाईक करत आहेत.

कादर पुनावाला नालासोपारा येथील रहिवासी

कादर पुनावाला हे नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील तेज प्रतिमा इमारतीत आपल्या कुटुंबासह राहतात. कादर हे मोहरमनिमित्त जयपूरला नातेवाईकाकडे गेले होते. तेथून जयपूर-मुंबई एक्सप्रेसने मुंबईला परतत असतानाच ही घटना घडली. विशेष म्हणजे काही वेळात ते आपल्या इच्छित स्थानकाजवळ पोहचणार इतक्यातही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कादर यांच्या कुटुंबीय आणि शेजाऱ्यांना धक्का बसला. कुटुंबीयांनी तात्काळ शताब्दी रुग्णालयाकडे धाव घेतली.

असगर कामाच्या शोधात मुंबईकडे निघाला अन्…

दुसरा मयत असगर हा मूळचा बिहारमधील मधुबनी येथील असून, कामाच्या शोधात तो जयपूरहून मुंबईला येत होते. असगर यांना चार मुलं आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कामानिमित्त ते मुंबईत येत होते. आरोपीने असगरवर चार गोळ्या झाडल्या. पोलिसांनी असगरच्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉल करुन मृतदेहाची ओळख पटवली. यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. असगरच्या कुटुंबीयांनी आरोपीला कोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच असगरवर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्याची मागणी करत सरकारकडे नुकसान भरपाई मागितली आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.