AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : वैयक्तिक कारणातून आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्याला संपवले, आरोपी अटक

वैयक्तिक वाद टोकाला गेला आणि पवईत भररस्त्यात थरार घडला. या घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

Mumbai Crime : वैयक्तिक कारणातून आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्याला संपवले, आरोपी अटक
वैयक्तिक वादातून तरुणाची हत्याImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 01, 2023 | 12:31 PM
Share

मुंबई / 1 ऑगस्ट 2023 : वैयक्तिक कारणातून आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यात वाद झाला. या वादातून कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्याची भररस्त्यात हत्या केल्याची घटना मुंबईतील पवई परिसरात घडली आहे. किरण गायकवाड असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. सोमवारी रात्री 8 वाजण्याच्यासुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संदीप बिऱ्हाडे असे अटक आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेनुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

काय घडलं नेमकं?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लव ट्रायंगलमधून हे हत्याकांड घडले आहे. किशोर गायकवाड आणि संदीप बिऱ्हाडे या दोघांचे एकाच मुलीवर प्रेम होते. यावरुन दोघांमध्ये वाद होते. सोमवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. अखेर हा वाद टोकाला गेला आणि बिऱ्हाडे याने चाकूने गायकवाड याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात किशोर गायकवाड हा जागीच ठार झाला.

घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळाचा पंचनामा करत हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. पवई पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.