AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाड्यांचे सायलेन्सर चोरायचे, नंतर मातीपासून खरंखुरं सोनं बनवायचे? तपास करताना पोलीसही चक्रावले

मातीपासून सोनं बनवणं, असं तुम्ही कधी ऐकलं आहे का? खरंतर पोलिसांसाठी देखील हे प्रकरण कदाचित नवीनच होतं. त्यामुळे सुरुवातीला पोलीसही चक्रावले.

गाड्यांचे सायलेन्सर चोरायचे, नंतर मातीपासून खरंखुरं सोनं बनवायचे? तपास करताना पोलीसही चक्रावले
गाड्यांचे सायलेन्सर चोरायचे, नंतर मातीपासून खरंखुरं सोनं बनवायचे? तपास करताना पोलीसही चक्रावले
| Edited By: Chetan Patil | Updated on: Aug 16, 2021 | 6:48 PM
Share

मुंबई : मातीपासून सोनं बनवणं, असं तुम्ही कधी ऐकलं आहे का? खरंतर पोलिसांसाठी देखील हे प्रकरण कदाचित नवीनच होतं. त्यामुळे सुरुवातीला पोलीसही चक्रावले. पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या माहितीतून चोर पैसे कमविण्यासाठी काय शक्कल लढवितात या विचाराने तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत मातीपासून सोने बनवण्याचा दावा करणाऱ्या टोळीला अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलैला कांदिवली पोलीस ठाण्यात इको कारच्या सायलेन्सर चोरीची घटना घडली होती. जेव्हा पोलिसांनी एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरु केला, तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी फक्त इको कारचे सायलेन्सर चोरतात आणि प्रथम सायलेन्सरच्या आतून माती काढतात. नंतर प्लॅटिनम तयार करण्यासाठी ती माती वितळवतात. त्यानंतर त्या प्लॅटिनममधून सफेद सोने म्हणजेच व्हाईट गोल्ड तयार करतात. एक इकोच्या सायलेन्सरमधून जवळपास एक किलो माती बाहेर येते, ज्याची बाजारात किंमत 75 हजार आहे, पण हे लोक माती फक्त 25 ते 30 हजारात विकतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तीन चोरांना बेड्या

याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुश्ताक गुल मोहम्मद शेख, सद्दाम हुसेन मोहम्मद शरीफ मनिहार आणि सुजित यादव अशी या आरोपींची नावे आहेत. हे सर्व कांदिवली आणि मालाड-मालवणीचे रहिवासी आहेत. ते गॅरेज लाईनशी जोडलेले आहेत, असं पोलिसांनी सांगितलं.

मुंबईत 40 पेक्षा जास्त वाहनांच्या चोऱ्या

आतापर्यंत 9 सायलेन्सर चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी दोन गुन्हे कांदिवली पोलीस ठाण्यात दाखल आहेत. चोरांनी संपूर्ण मुंबईत 40 हून अधिक वाहनांचे सायलेन्सर चोरले आहेत. ही टोळी संपूर्ण भारतात सक्रिय आहे. आणि आणखी काही लोक यामध्ये सामील आहेत, ज्याची पोलीस चौकशी करत आहेत.

हेही वाचा :

स्वत:सोबत इतरांचाही जीव धोक्यात, अतिउत्साही तरुणांचा कारच्या बोनटवर बसून स्टंटबाजी

अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा झटका, सर्व मागण्या फेटाळल्या, शेवटचा पर्यायही संपला?

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.