AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाड्यांचे सायलेन्सर चोरायचे, नंतर मातीपासून खरंखुरं सोनं बनवायचे? तपास करताना पोलीसही चक्रावले

मातीपासून सोनं बनवणं, असं तुम्ही कधी ऐकलं आहे का? खरंतर पोलिसांसाठी देखील हे प्रकरण कदाचित नवीनच होतं. त्यामुळे सुरुवातीला पोलीसही चक्रावले.

गाड्यांचे सायलेन्सर चोरायचे, नंतर मातीपासून खरंखुरं सोनं बनवायचे? तपास करताना पोलीसही चक्रावले
गाड्यांचे सायलेन्सर चोरायचे, नंतर मातीपासून खरंखुरं सोनं बनवायचे? तपास करताना पोलीसही चक्रावले
| Edited By: Chetan Patil | Updated on: Aug 16, 2021 | 6:48 PM
Share

मुंबई : मातीपासून सोनं बनवणं, असं तुम्ही कधी ऐकलं आहे का? खरंतर पोलिसांसाठी देखील हे प्रकरण कदाचित नवीनच होतं. त्यामुळे सुरुवातीला पोलीसही चक्रावले. पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या तपासात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या माहितीतून चोर पैसे कमविण्यासाठी काय शक्कल लढवितात या विचाराने तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत मातीपासून सोने बनवण्याचा दावा करणाऱ्या टोळीला अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलैला कांदिवली पोलीस ठाण्यात इको कारच्या सायलेन्सर चोरीची घटना घडली होती. जेव्हा पोलिसांनी एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरु केला, तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी फक्त इको कारचे सायलेन्सर चोरतात आणि प्रथम सायलेन्सरच्या आतून माती काढतात. नंतर प्लॅटिनम तयार करण्यासाठी ती माती वितळवतात. त्यानंतर त्या प्लॅटिनममधून सफेद सोने म्हणजेच व्हाईट गोल्ड तयार करतात. एक इकोच्या सायलेन्सरमधून जवळपास एक किलो माती बाहेर येते, ज्याची बाजारात किंमत 75 हजार आहे, पण हे लोक माती फक्त 25 ते 30 हजारात विकतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तीन चोरांना बेड्या

याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुश्ताक गुल मोहम्मद शेख, सद्दाम हुसेन मोहम्मद शरीफ मनिहार आणि सुजित यादव अशी या आरोपींची नावे आहेत. हे सर्व कांदिवली आणि मालाड-मालवणीचे रहिवासी आहेत. ते गॅरेज लाईनशी जोडलेले आहेत, असं पोलिसांनी सांगितलं.

मुंबईत 40 पेक्षा जास्त वाहनांच्या चोऱ्या

आतापर्यंत 9 सायलेन्सर चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी दोन गुन्हे कांदिवली पोलीस ठाण्यात दाखल आहेत. चोरांनी संपूर्ण मुंबईत 40 हून अधिक वाहनांचे सायलेन्सर चोरले आहेत. ही टोळी संपूर्ण भारतात सक्रिय आहे. आणि आणखी काही लोक यामध्ये सामील आहेत, ज्याची पोलीस चौकशी करत आहेत.

हेही वाचा :

स्वत:सोबत इतरांचाही जीव धोक्यात, अतिउत्साही तरुणांचा कारच्या बोनटवर बसून स्टंटबाजी

अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टाचा झटका, सर्व मागण्या फेटाळल्या, शेवटचा पर्यायही संपला?

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन