AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virar Suicide : विरारमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या! आत्महत्येचं कारण काय?

Virar crime news : नितीश चौरसिया असं आत्महत्या करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते 38 वर्षांचे होते.

Virar Suicide : विरारमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या! आत्महत्येचं कारण काय?
आत्महत्येनं खळबळImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 19, 2022 | 11:36 AM
Share

विरार : रेल्वे कर्मचाऱ्याच्या आत्महत्येच्या (Virar Suicide News) घटनेनं विरार हादरलंय. डोक्यात गोळी झाडून घेत एका रेल्वे कर्मचाऱ्यानं (Railway employee Suicide) आत्महत्या केली. अंधेरीत इंजिनिअर म्हणून हा रेल्वे कर्मचारी कार्यरत होता. राहत्या घरी या रेल्वे कर्मचाऱ्यानं डोक्यात गोळी झाडून घेत जीव दिलाय. नेमकी या रेल्वे कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचं कारण काय होतं? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. शनिवारी मध्यरात्री आत्महत्येची ही घटना घडली. विरार (Virar Crime News) पोलिसांनी आत्महत्या केलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतलाय. हा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास केला जातोय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीय.

नेमकं काय घडलं?

नितीश चौरसिया असं आत्महत्या करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते 38 वर्षांचे होते. विरार पश्चिमेच्या राम निवास बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावर ते राहत होते. डोक्यात गोळी झाडून घेत त्यांनी जीव दिलाय. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौरसिया यांच्या निवासस्थानी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कारवाई केली आहे.

दरम्यान, आत्महत्या केलेल्या नितीश चौरसिया यांचा भाचा राजेंद्र यानं या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे. आत्यानं सांगितल्यानंतर आपण लगेचच तिच्या घरी गेला. त्यावेळी नितीश यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांनी आत्महत्या केल्याचं आधी लक्षात आलं नाही. आम्ही त्यांना लगेचच रुग्णालयात घेऊन गेलो. पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना कोणत्या प्रकारचा ताण होता का? याची माहिती नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. शिवाय नितीश हे काही वैद्यकीय गोळ्यांचं सेवनही करत होते, अशीही माहिती राजेंद्र चौरसिया यांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ : अमरावतीत पुराच्या पाण्यात दुचाकी वाहून गेली

का केली आत्महत्या?

नितीश यांनी आत्महत्या का केला? याचं कारण स्पष्ट झालं नसून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. नितीश यांचा मृतदेह जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यता आलाय. त्यांच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टची विरार पोलिसांना प्रतिक्षा आहे. सध्या पोलीस या प्रकरणी संबंधितांची चौकशी करत आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.