AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Murder | फरशीनं वार, 16 वर्षांच्या तरुणाचा खून! परभणी हादरलं, का करण्यात आली निर्घृणपणे हत्या?

Parbhani Murder : एका 16 वर्षांच्या तरुणाचा खून करण्यात आला. दत्ता गणेश मिरासे असं 16 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.

Murder | फरशीनं वार, 16 वर्षांच्या तरुणाचा खून! परभणी हादरलं, का करण्यात आली निर्घृणपणे हत्या?
परभणीत तरुणाची हत्या!
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Feb 13, 2022 | 11:04 PM
Share

परभणी : परभणीतून (Parbhani) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परभणीमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला (Main accuse of murder) पकडण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. परभणी याप्रकरणी आता अधिक तपास केला जातो आहे. परभणीच्या नानलपेठं पोलिस (Parbhani Police) ठाण्याच्या हद्दीत मदिना पाटी जवळ ही हत्येची घटना घडली. एका 16 वर्षांच्या तरुणाचा खून करण्यात आला. दत्ता गणेश मिरासे असं 16 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या घटनेप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून आता या हत्येचं गूढ उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. सध्या परभणी पोलिस या धक्कादायक घटनेचा तपास करत आहेत.

कशी करण्यात आली हत्या?

जागेच्या वादातून एका 16 वर्षीय युवकाचा फरशीने वार करत निर्घृणपणे खून करण्यात आला. रविवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. नानलपेठ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मदिना पाटी या भागात ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दत्ता गणेश मिरासे असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे . तो शहरातील रामेश्वर प्लॉट भागातील रहिवाशी होता.

परिसरात खळबळ

घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान , घटनेची माहिती मिळताच नानलपेठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शव ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, दहा वाजेपर्यंत कुणी फिर्याद दिली नसल्याने अद्यापपर्यंत तरी गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र पोलिसांनी तपास चक्रे फिरवली आहेत.

हत्येचं गूढ उकलण्याचं आव्हान

लवकरच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याची माहिती नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांनी दिली आहे. हत्येच्या या घटनेमुळे परभणी शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलाय. त्यामुळे पोलीस तपासात नेमकं काय निष्पन्न होते, हे ही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नेमका या हत्येचा घटनाक्रम काय होता, याबाबत पोलिासांकडून तपासाला वेग आला आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईतील चारकोप तलावात दोन तरुण बुडाले, एकाला सुखरूप बाहेर काढलं, दुसरा…

वर्ध्यात दारूच्या नशेतील नोकराला लुटले, 47 लाखाचे दागिने लंपास, अवघ्या काही तासात आरोपी अटक

सांगलीत चक्क रेल्वे पोलिसाला ऑनलाईन गंडा, लाखो रुपयांची केली फसवणूक

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली