AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रत्नागिरीत पत्रकाराची हत्या, जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला हा सवाल; म्हणाले, हा सत्तेचा…

रिफायनरीच्या विरोधात लिहितो या रागात माथी भडकलेले काही राजकीय माथेफिरुंनी शशिकांत वारीसे या पत्रकाराला अर्धा किलोमीटर फरफटक नेऊन ठार केलं. याला जबाबदार नेमकं कोण?

रत्नागिरीत पत्रकाराची हत्या, जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला हा सवाल; म्हणाले, हा सत्तेचा...
| Edited By: | Updated on: Feb 09, 2023 | 9:41 PM
Share

रत्नागिरी : हा सत्येचा माज म्हणायचा काय, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. रत्नागिरीतल्या पत्रकाराच्या हत्येप्रकरणी (journalist murder) त्यांनी हा सवाल केलाय. रिफायनरी (Refinery) विरुद्ध लिहिल्याचा राग, राजकीय माथेफिरुंनी ठार केलं. पत्रकार शशिकांत वारुसे यांना अर्धा किलोमीटर फरफटत ठार केलं. याचा जबाबदार कोण, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी ट्वीट केलंय. हा सत्तेचा माजच म्हणायचं का? रिफायनरीच्या विरोधात लिहितो या रागात माथी भडकलेले काही राजकीय माथेफिरुंनी शशिकांत वारीसे या पत्रकाराला अर्धा किलोमीटर फरफटक नेऊन ठार केलं. याला जबाबदार नेमकं कोण? महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात तरी आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी

रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याला अटक करण्यात आली. त्यानंतर पंढरीनाथ आंबेरकर जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. छातीत दुखत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या पंढरीनाथ आंबेरकर याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

घातपाताचा संशय

पत्रकार शशिकांत वारिसे याचा अपघाती संशयास्पद मृत्यू झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा संशयस्पद अपघाती मृत्यू प्रकरणाचे गुढ वाढत चाललंय. या अपघाती मृत्यूमुळे आता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यांच्या निकटवर्तीयांनी यामध्ये घातपाताचा संशय व्यक्त केलाय. वारीसे यांनी प्रसिद्ध केलेली बातमी आणि त्यांचा मृत्यू यांचा काही संबंध आहे का? या भोवती सारे प्रश्न येवून अडकत आहेत.

थार गाडीची जोरदार धडक

कशेळी गावात राहणाऱ्या पत्रकार वारिसे यांच्या घरी शोकाकुल परिस्थिती आहे. आई मुलगा असा परिवार असणाऱ्या वारीसे यांच्या कुटुंबाला धीर देण्यासाठी गावकरी पुढे सरसावलेत. वारीसे राजापूर इथल्या पेट्रोलपंपावर आपल्या दुचाकीवर होते. यावेळी त्यांना वेगानं आलेल्या पंढरीनाथ आंबेरकर यांच्या थार गाडीची जोराची धडक बसली. त्यानंतर मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा कोल्हापूर इथं मृत्यू झाला.

नातेवाईकांची कठोर कारवाईची मागणी

पत्रकार शशिकांत वारिसे अपघाती संशयास्पद मृत्यू झाला. नातेवाईकांच्या मागणीनंतर थार चालक पंढरी आंबेरकर यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नातेवाईकांकडून कठोर कारवाईची मागणी केली. तर, रिफायनरी विरोधक आक्रमक झालेत. शनिवारी रिफायनरी विरोधक मोर्चा काढणार आहेत. बातमी दिल्याच्या रागातून अपघात करण्यात आला का, याचा पोलीस तपास करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.