AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भेंडीची भाजी न आवडल्याने मुलाने घेतला टोकाचा निर्णय, नागपुरातील घटनेने पोलिस चक्रावले

नागपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आईने भेंडीची भाजी केली होती, मात्र मुलाला भेंडीची भाजी आवडली नाही. यानंतर मुलाने टोकाचं पाऊल उचललं असल्याचे समोर आले आहे.

भेंडीची भाजी न आवडल्याने मुलाने घेतला टोकाचा निर्णय, नागपुरातील घटनेने पोलिस चक्रावले
Bhindi Bhaji
| Updated on: Jul 15, 2025 | 9:01 PM
Share

अनेकदा मुलांना आईने केलेली भाजी आवडत नाही. त्यामुळे अनेक मुलं उपाशी राहतात किंवा दुसरी भाजी करण्यास सांगतात. मात्र नागपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आईने भेंडीची भाजी केली होती, मात्र मुलाला भेंडीची भाजी आवडली नाही, त्यामुळे त्याने भाजी खाण्यास नकार दिला. त्यामुळे आई त्याच्यावर रागावली आणि याच कारणामुळे मुलाने टोकाचं पाऊल उचललं असल्याचे समोर आले आहे.

भेंडीची भाजी न खाल्ल्यामुळे आई मुलाला ओरडली होती, मात्र त्यामुळे राग आल्याने मुलगा चक्क घर सोडून दिल्लीला गेल्याची घटना घडली आहे. हा मुलगा आई ओरडल्यानंतर घरातून बाहेर पडला आणि ट्रेनने दिल्लीला गेला. नागपुरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने पोलिसही चक्रावले असल्याचे समोर आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाची आई नेहमी भेंडीची भाजी करायची. त्यामुळे बऱ्याचदा त्याचं आई सोबत भांडण होत असायचं. अकरा तारखेच्या रात्रीही भेंडीची भाजी केल्यामुळे दोघाचे भांडण झालं. भाजी न खाल्ल्यांमुळे त्याची आई रागावली. यानंतर रागाच्या भरात या मुलाने चक्क घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. तो रागात रेल्वे स्टेशनला गेला आणि दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेत बसला. काही तासांनी तो दिल्लीत पोहोचला.

घर सोडल्यानंतर त्याने स्वतः जवळचा मोबाईलही स्विच ऑफ केला. त्यामुळे पालकांना त्याचा शोध घेता आला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडेही शोध घेतला मात्र तो सापडला नाही, शेवटी पालकांनी पोलिसात तक्रार दिली. कोतवाली पोलिसांनी मुलगा अल्पवयीन असल्यामुळे संवेदनशीलता दाखवत तात्काळ शोध मोहीम राबवली.

सायबर विभागाने त्याच्या डिटेल्स तपासल्यानंतर तो दिल्लीला गेल्याचे समजलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या दिल्लीतील मित्राशी संपर्क साधला, त्यावेळी तो दिल्लीत असल्याचे समजले. यानंतर पोलिसांचे एक पथक दिल्लीला गेलं आणि त्या मुलाला नागपुरात आणण्यात आलं. यामुळे कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यानंतर पालकांनी पोलिसांचे आभार मानत कृतज्ञ भावना व्यक्त केली.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.