AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोपीला मारहाण करणं अंगाशी, पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल, सीआयडीने तपास नेमका कसा केला?

चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना बेदम मारहाण करणं पोलिसांच्या अंगाशी बेतलं आहे (CID file case against five cops who allegedly murder accused in Gondia)

आरोपीला मारहाण करणं अंगाशी, पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल, सीआयडीने तपास नेमका कसा केला?
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 28, 2021 | 6:32 PM
Share

गोंदिया : चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना बेदम मारहाण करणं पोलिसांच्या अंगाशी बेतलं आहे. आरोपीचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याने आरोपीच्या बहिणीने पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपवण्यात आलं. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी केलेल्या तपासात पोलीस निरीक्षकासह, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह तीन पोलीस शिपाई हे दोषी असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे सीआयडीने पाचही पोलिसांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. सीआयडीने आरोपींना न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयाने आरोपींना 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे आरोपींमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक हा पसार झाला आहे (CID file case against five cops who allegedly murder accused in Gondia).

नेमकं प्रकरण काय?

आमगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या कुंभारटोली जिल्हा परिषद शाळेत तीन चोरट्यांनी 20 मे रोजी दरोडा घातला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली. गुन्हे शाखेने 21 मे रोजी आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले. पण पोलिसांनी आरोपींना बेदम मारहाण केलं. या मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू झाला. या आरोपीचं नाव राजकुमार धोती असं होतं. याप्रकरणी आरोपीच्या बहिणीने पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. पोलिसांनीच तिच्या भावाचा खून केला, असा आरोप तिने केला होता (CID file case against five cops who allegedly murder accused in Gondia).

सीआयडीच्या तपासात पोलीस दोषी असल्याचं सिद्ध

दरम्यान, मृतक राजकुमार धोती याच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याचं उघड झालं. त्यामुळे त्याला पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. हे प्रकरण जास्त तापल्याने अखेर सीआयडीकडे तपासाचे सूत्र देण्यात आले. सीआयडीने केलेल्या तपासात संबंधित पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे दोषी असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे सर्व दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपींना अखेर बेड्या

महाराष्ट्रात पहिल्यांदाच एकाच वेळेला एकाच पोलीस ठाण्यात इतक्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुभाष चौहान, सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे, अरुण उके, दत्तातय कांबळे यांच्या विरोधात कलम 302, 330, 334 अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. तर पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव हा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हेही वाचा : आईच्या प्रियकराचा मुलींवर अनेकदा बलात्कार, दुसरीकडे बाप मुलींना विकायला निघाला, गुंतागुंतीचं किळसवाणं कृत्य अखेर उघड

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.