AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : दोघे मित्र नेहमीप्रमाणे पान टपरीवर बसले होते, अचानक भररस्त्यात जे घडलं त्याने सर्वच हादरले !

नागपूरमध्ये गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभे आहे. भररस्त्यात हल्ले, हत्या अशा घटना सर्रासपणे घडत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Nagpur Crime : दोघे मित्र नेहमीप्रमाणे पान टपरीवर बसले होते, अचानक भररस्त्यात जे घडलं त्याने सर्वच हादरले !
नागपूरमध्य़े दोघा तरुणांवर हल्ला
| Edited By: | Updated on: Aug 17, 2023 | 3:15 PM
Share

नागपूर / 17 ऑगस्ट 2023 : नागपूरमध्ये हत्यासत्र थांबता थांबेना. शहराच्या लगत असलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. राजीवनगर जवळ दोन मित्रांवर काही तरुणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण हा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कळते. राकेश मिश्रा असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रवी जयस्वाल असे जखमी तरुणाचे आहे. आरोपींची ओळख पटली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पान टपरीवर बसले होते अन्…

राकेश मिश्रा रवी जयस्वाल हे दोघे मित्र रात्री साडेनऊच्या सुमारास राजीव नगर येथील पान टपरीवर बसले होते. त्याचवेळी कारमधून 7 ते 8 अज्ञात हल्लेखोर त्याठिकाणी आले आणि दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये राकेश मिश्राचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. राकेश आणि रवी दोघेही आरटीओशी संबंधित कागदपत्रे तयार करण्याचे काम करायचे. ते दररोज सायंकाळी बसस्टॉपवर येऊन बाजूला एका टपरीवर बसायचे.

नेहमीप्रमाणे ते तिथे बसले असताना काही अंतरावर कारमधून 7 ते 8 तरुण उतरले. त्यांनी तोंडाला दुपटे बांधले होते. राकेश आणि रविच्या जवळ येऊन त्यांनी धारदार हत्याराने सपासप वार सुरू केले. राकेश मिश्रा हे जखमी होऊन जागीच निपचित पडले तर रवी हा जीव वाचविण्यासाठी बाजूला असलेल्या महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये लपला. काचेचं कॅबिन हे आतून बंद केलं. परंतु आरोपी त्याचा पाठलाग करीत तिथे पोहचले. त्यांनी काचेच्या कॅबिन फोडून आतमध्ये घुसून रुग्ण आणि डॉक्टर समोरचं त्यालाही गंभीर जखमी केले. त्यानंतर सर्व आरोपी ज्या कारने आले होते. त्या कारमध्ये बसून पळून गेले.

आरोपींची ओळख पटवण्यास यश

आरोपींची ओळख पटली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाणार असल्याचं पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितलं. हा हल्ला नेमका कुठल्या कारणावरून झाला? याबाबत अद्यार कळू शकले नाही. तपासाअंतीच हे स्पष्ट होईल.

Follow Us
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.