AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बरं नसल्याने लग्नाला गेले नाही…नंतर जे काही घडलं त्यात आजोबांचा मृत्यूच झाला…

नाशिक शहरातील अंबड वसाहतीत एक्स्लो पॉईंट परिसरात राहणाऱ्या बच्चू कर्डेल यांचा खून झाला असून त्यांच्या घरातील लाखों रुपयांचे दागिने चोरीला गेले आहे.

बरं नसल्याने लग्नाला गेले नाही...नंतर जे काही घडलं त्यात आजोबांचा मृत्यूच झाला...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Nov 26, 2022 | 11:02 AM
Share

नाशिक : नाशिकच्या ग्रामीण भागातील दरोडयाचे लोण आता नाशिक शहरात येऊन ठेपले आहे. शुक्रवारी रात्री नाशिकच्या अंबड परिसरात एका वृद्धाचा खून करून दागिने आणि रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये बच्चू सदाशिव कर्डेल या 65 वर्षीय वृद्धाचा खून झाला आहे. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. अंबडच्या कर्डेल मळ्यात हा सर्व प्रकार घडला आहे. कर्डेल यांच्या खुनाची घटना पोलिसांना समजताच नाशिक शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. कर्डेल यांच्या चुलत पुतण्याची हळद समारंभ होता, त्याकरिता संपूर्ण कुटुंब हळदीला गेले होते. लग्नाची सर्वधामधूम असल्याने संपूर्ण कुटुंब बाहेर गेले होते. मात्र, बच्चू कर्डेल यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी घरीच थांबतो, मळ्यात कोणीतरी थांबायला पाहिजे म्हणून बच्चू सदाशिव कर्डेल थांबले होते. अचानक दहा वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरात घुसून डोक्यात तीक्ष्ण हत्याराणे वार केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक शहरातील अंबड वसाहतीत एक्स्लो पॉईंट परिसरात राहणाऱ्या बच्चू कर्डेल यांचा खून झाला असून त्यांच्या घरातील लाखों रुपयांचे दागिने चोरीला गेले आहे.

बच्चू कर्डेल यांच्या चुलत भावाच्या मुलाची हळद समारंभ असल्याने घरातील सर्व कुटुंब बाहेर गेले होते. हीच संधी साधून दरोडेखोरांनी बच्चू कर्डेल यांच्या डोक्यात हत्याराणे वार करून जीवे ठार मारले आहे.

यावेळी घरातील कोठीत दागिने आणि लाखों रुपयांची रोकड ठेवण्यात आली होती, ती देखील दरोडेखोरांनी लंपास केली आहे.

यामध्ये चोरांना जर चोरी करायची होती तर बच्चू कर्डेल यांना जीवे ठार का मारले ? असा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहे.

ग्रामीण भागात महिनाभरातच पाच दरोडे पडल्याची घटना समोर आली आहे त्यात आता दरोडे शहरातही पडू लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून कारवाईची मागणी केली जात आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.