AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झोपण्यापूर्वी कल्पना सुद्धा केली नसेल, दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ, तीन वर्षांचा मुलगा साखर झोपेत असतानाच…

खरंतर लहान मुलं घरात असतील तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याचे आवाहन वारंवार करण्याची वेळ येत आहे. नाशिकच्या अंबड परिसरात अशीच एक घटना घडली असून त्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

झोपण्यापूर्वी कल्पना सुद्धा केली नसेल, दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ, तीन वर्षांचा मुलगा साखर झोपेत असतानाच...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Apr 27, 2023 | 11:24 AM
Share

चैतन्य गायकवाड, टीव्ही 9 मराठी, नाशिक : कधी कधी अशा काही घटना घडत असतात की माणूस त्यामुळे निशब्द होऊन जातो. त्याला व्यक्त होणं देखील अवघड होऊन जातं. अशीच काहीशी घटना नाशिकच्या अंबड परिसरात घडली आहे. घटना ऐकून तुम्हाला असे वाटेल की हे दुश्मनाच्या घरात सुद्धा घडायला नको. अंबड परिसरातील जाधव संकुल परिसरात विश्वकर्मा कुटुंब राहतं. त्याच घरात तीन वर्षीय शौर्य नावाचा मुलगा होता. हा मुलगा गाड झोपेत असतांना त्याच्या अंगावर बाजूला असलेले लाकडी कपात पडले होते. उपचार करण्याची वेळ सुद्धा आली नाही, त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. खरंतर ही घटना घडताच शौर्यला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यापूर्वीच डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले.

तीन वर्षीय मुलाचा झोपेत असतांनाच दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. लाकडी कपाट हे अधिक वाजनाचे होते. त्यात पडता क्षणीच होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे उपचारासाठी कुठलीही संधी राहिली नव्हती.

नाशिकच्या अंबड परीसारतील जाधव संकुल येथे राहणाऱ्या विश्वकर्मा कुटुंबात ही घटना घडली आहे. अगदी लाडात वाढलेल्या शौर्याचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे.

खरंतर घरात लहान मुलं असो वा इतर कोणीही झोपेत असतांना आजूबाजूला अंगावर पडेल अशी कुठली वस्तु नाही ना याची खात्री करणे गरजेचे आहे. यापूर्वी अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. त्यामध्ये विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

या घटनेने अंबड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद केली असून अधिकचा तपास केला जात आहे. मात्र, घडलेली दुर्दैवी घटना पाहता निष्पाप बळी गेल्यानं अनेकांचे डोळे पाण्याने भरून येत आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.