AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकचं बिहार होतंय का? गेल्या दहा दिवसांत 6 प्राणघातक हल्ले, अडीच महिन्यांची आकडेवारी पाहून तुम्हाला धक्काच बसेल…

नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी बघता शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक आणि शांत शहर म्हणून ओळख असल्याची स्थिती पाहता बिहार होत आहे का ? असा प्रश्न आता पडू लागला आहे.

नाशिकचं बिहार होतंय का? गेल्या दहा दिवसांत 6 प्राणघातक हल्ले, अडीच महिन्यांची आकडेवारी पाहून तुम्हाला धक्काच बसेल...
नाशिकमध्ये हल्ल्यात मॅनेजरचा मृत्यूImage Credit source: Google
| Updated on: Mar 23, 2023 | 1:08 PM
Share

नाशिक : गेल्या अडीच महिन्यांपासूनच्या गुन्हेगारीच्या घटना पहिल्या तर नाशिकचा बिहार होतोय का ? असा संतप्त सवाल दहशतीच्या सावटाखाली वावरत असलेल्या नाशिककरांना पडू लागला आहे. खरंतर नाशिकची ओळख म्हणजे मंदिरांची नगरी आहे. त्यामुळे भक्तिमय वातावरणात असलेलं शांत शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. मात्र, 2023 उजाडल्यापासून नाशिक शहरातील गुन्हेगारी अधिकच वाढत चालली आहे. त्यामध्ये प्राणघातक हल्ल्याच्या सातत्याने वाढत असून भरदिवसा शहरात गोळीबार आणि कोयते घेऊन गुंडांकडून दहशत निर्माण केली जात आहे. नाशिकमधील गुन्हेगारीचा वाढता आलेख बघता पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहे.

रविवारच्या दिवशी शहरात कार्बन नाका परिसरात एकावर हल्ला करण्यात आला त्यावेळी बंदूक आणि कोयत्याचा त्यामध्ये वापर करण्यात आला होता. त्यापूर्वी पंचवटीमध्ये एकावर हल्ला करत असतांना गोळीबार करण्यात आला होता. त्यामध्ये एक महिला आणि श्वान जखमी झाला होता.

त्यापूर्वी मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बजरंग वाडीत दोन गटात दंगल झाल्याची नोंद करण्यात आली असून त्यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले होते. याच आठवड्यात सातपुर येथे जमिनीच्या वादातून हल्ला झाल्याची घटना घडली होती.

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत होळीच्या दिवशी एकावर चाकूने हल्ला केला होता. तर इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही जुन्या वादातून कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली होती. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडनेर येथेही गाडी अंगावर चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता.

त्यामुळे एकूण दहा दिवसांत सहा हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. तर अडीच महिण्यात 19 गंभीर गुन्हे घडल्याची नोंद नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत झाली आहे. त्यामुळे शहरात गुन्हेगारी बोकाळली असून पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांची नाराजी पाहायला मिळत आहे.

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.