AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक पोलिसांची अनोखी भेट; नागरिकांना आनंदाश्रू आवरेनात, चोरीस गेलेला साडेतीन कोटींचा ऐवज केला परत

नाशिक पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत एकावर एक आनंदाचे धक्के देणे सुरूच ठेवले आहे. त्यात आता चोरीस गेलेला तब्बल साडेतीन कोटींचा मुद्देमाल नागरिकांना परत केला. त्यामुळे अनेकांना आपला ऐवज मिळाल्याचे पाहून आनंदाश्रू अनावर झाले.

नाशिक पोलिसांची अनोखी भेट; नागरिकांना आनंदाश्रू आवरेनात, चोरीस गेलेला साडेतीन कोटींचा ऐवज केला परत
नाशिक पोलिसांनी तब्बल साडेतीन कोटींचा चोरीस गेलेला ऐवज नागरिकांना परत केला.
| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 2:55 PM
Share

नाशिकः नाशिक पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत एकावर एक आनंदाचे धक्के देणे सुरूच ठेवले आहे. यात कारवाई करत दोन बनावट दारूचे कारखाने उद्धवस्त केले. बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या. त्यानंतर आता चोरीस गेलेला तब्बल साडेतीन कोटींचा मुद्देमाल नागरिकांना परत केला. त्यामुळे अनेकांना आपला ऐवज मिळाल्याचे पाहून आनंदाश्रू अनावर झाले.

गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये अनेकांच्या वस्तू चोरीला गेल्या. त्यात कुणाचे मोबाइल, कुणाची दुचाकी तर कुणाचे सोन्याचे गंठण. ही यादी खूप लांबवता येऊ शकते. इतकी की, मारुतीच्या लांबणाऱ्या शेपटीप्रमाणे तिचा अंत होणार नाही. मात्र, या दरम्यान नाशिक पोलिसांनी एक सुखद धक्का शहरवासीयांना दिला आहे. चोरीच्या अनेक घटनांमध्ये विविध पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत्या. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास केला. अनेक चोरटे आणि गुन्हेगाऱ्यांना तुरुंगाच हवा खायला लावली. त्यांच्याकडून गोळा केलेला मुद्देमाल संबंधितांना एका कार्यक्रमाच्या माध्यमातून परत करण्यात आला. त्यात कुणाचे दागिने, मोबाइल, महत्त्वाच्या वस्तू, मोटारसायकल यांचा समावेश होता. आता आपली एखादी वस्तू चोरीस गेली म्हटले की, आपण तिचा विचार सोडून देतो. असेच अनेकांनी केले होते. त्यात सध्या महागाईने गाठलेला कळस. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या गेलेल्या नोकऱ्या. या काळात बऱ्याच जणांना मोबाइल, चोरीला गेलेली मोटारसायकल आणि दागिने ते ही ऐन सुणासुदीच्या तोंडावर मिळाले. हे पाहता त्यांचे आनंदाश्रू अनावर झाले. पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. पोलीस आयुक्तांचे आभार मानले.

हा मुद्देमाल केला परत

पोलिसांनी परत केलेल्या मुद्देमालामध्ये 2976000 किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, 4050000 किमतीच्या मोटारसायकल, 302000 किमतीचे मोबाइल, 27582550 किमतीची रोख रोखक्कम व इतर मुद्देमाल असा एकूण 35090650 किमतीचा मुद्देमाल नागरिकांना देण्यात आला. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्यासह पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, पोलीस उपायुक्त विजय खरात, परिमंडळ आयुक्त आणि इतर पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, फिर्यादींची उपस्थिती होती.

Follow Us
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.