AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरीच्या शोधात निघालेल्या तरुणीला बसने चिरडले; नाशिकमध्ये चटका लावणारा अपघात

नाशिकमध्ये नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 21 वर्षांच्या तरुणीला बसने चिरडल्याची घटना घडलीय. वैशाली शिवाजी गायकवाड असे तरुणीचे नाव असून, तिचा जागीच मृत्यू झाला.

नोकरीच्या शोधात निघालेल्या तरुणीला बसने चिरडले; नाशिकमध्ये चटका लावणारा अपघात
नाशिकमध्ये बसने तरुणीला चिरडले.
| Updated on: Feb 12, 2022 | 9:32 AM
Share

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) नोकरी (Job) शोधण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 21 वर्षांच्या तरुणीला बसने चिरडल्याची घटना घडलीय. वैशाली शिवाजी गायकवाड असे तरुणीचे नाव असून, तिचा जागीच मृत्यू झाला. वैशाली ही शहर पोलीस (Police) आयुक्तालयातील अंमलदार शिवाजी गायकवाड यांची मुलगी आहे. या घटनेने पोलीस दलात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकीकडे प्रचंड वाढलेली बेरोजगारी आणि त्यात काळाने असा उगवलेला सूड पाहून सामान्य माणसांच्या हृदयाचा ठोका चुकला आहे. शिवाय गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रस्त्यावर बेफाम धावणारे वाहने पादचाऱ्यांचा कधी बळी घेतील याचा नेम नाही. त्यामुळे शहर परिसरात तरी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी सक्ती करावी, अशा वाहनधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कशी घडली घटना?

वैशाली शिवाजी गायकवाड ही तरुणी शुक्रवारी नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडली. ती मुख्य बसस्थानक परिसरात आली. त्यावेळी नंदुरबारकडे निघालेल्या बसने (एम.एच.15 बी.एल. 3445) वैशालीला चिरडले. एसटी बसस्थानकातून बाहेर पडली. त्यावेळी वैशाली रस्ता ओलांडत होती. वैशालीला बसची जबर धडक बसली. ती जागेवरच कोसळली. तिला चांगलाच मार लागला होता. त्यामुळे नागरिकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तिच्या डोक्याला अंतर्गत गंभीर जखम झाली. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

चालकाचा पोबारा

अपघात झाल्यानंतर बसच्या चालकाने वाहन जागीच सोडून पोबारा केल्याचे समोर आले. वैशालीचे वडील पोलीस आयुक्तालयात अंमलदार आहेत. तिच्या अपघाताची बातमी समजताच सरकार वाडा पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी तातडीने रुग्णालयात आले. मात्र, त्यांच्या कानावर वैशालीच्या निधनाची वार्ता पडली. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. वैशाली अतिशय हुशार होती. तिची अनेक स्वप्ने होती. आपल्या वडिलांचा आधार तिला व्हायचे होते. त्यासाठीच ती नोकरी शोधत होती. मात्र, तिच्यावर काळाने असा घाला घातला. त्यामुळे गायकवाड कुटुंबार दुःखाचा डोंगर कोसळाय.

इतर बातम्याः

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.