AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News | हॉटेल वैशालीचा या कारणावरुन वाद, प्रकरण थेट पोलिसांत

pune hotel vaishali | पुणे शहरातील हॉटेल वैशाली नेहमी आपल्या अनोख्या चवीमुळे चर्चेत असते. आता या हॉटेल वैशालीचा मालकीचा वाद रंगला आहे. हा वाद दोन भागिदारांमध्ये नाही तर चक्क पती आणि पत्नीमध्ये आहे. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले आहे.

Pune News | हॉटेल वैशालीचा या कारणावरुन वाद, प्रकरण थेट पोलिसांत
Hotel Vaishali
| Updated on: Oct 05, 2023 | 2:55 PM
Share

अभिजित पोते, पुणे | 5 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात प्रसिद्ध असलेले हॉटेल वैशाली हिला तब्बल 72 वर्षांचा इतिहास आहे. खव्वयांमध्ये नेहमी या हॉटेलची चर्चा असते. या हॉटेलमधील पदार्थांचा स्वाद घेण्यासाठी पुण्यातूनच नाही तर जवळपासच्या भागातूनही लोक येतात. सध्या हे हॉटेल चर्चेत आले आहे. परंतु खाण्यासाठी नाही तर वेगळ्याच कारणामुळे त्याची चर्चा होत आहे. या हॉटेलमधील मालकीवरुन वाद रंगला आहे. हा वाद दोन पार्टनरमध्ये नाही तर पती आणि पत्नीमध्ये आहे. आता हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेला आहे.

काय आहे प्रकरण

पुणे येथील वैशाली हॉटेलच्या मालक निकिता शेट्टी आहेत. त्यांनी पती विश्वजीत विनायक जाधव यांच्यावर आरोप केला आहे. पती आणि इतरांकडून हे हॉटेल बळकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विश्वजीत जाधव यांनी आपली खोटी सही करुन फ्लॅट तारण ठेवला. त्यानुसार पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप निकिता शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारात केला आहे. त्यानंतर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनाही केले आरोपी

वैशाली हॉटेलच्या मालक असलेल्या निकिता शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीत पती विश्वजीत विनायक जाधव यांच्यासह इतर काही जणांची नावे आहेत. त्यात कोटक महिंद्रा बँकेच्या येरवडा शाखेचे व्यवस्थापक राजेश देवचंद्र चौधरी, डीएसए आर. आर. फायनान्सचे रवी परदेशी यांचा समावेश आहे. यामुळे पोलिसांनी या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच हॉटेल वैशालीची मालकीही विश्वजीत जाधव यांनी आपल्याला नशा देऊन काढल्याचा आरोप निकीता शेट्टी यांनी केला आहे.

हॉटेल वैशालीचा इतिहास असा

जगन्नाथ शेट्टी यांनी पुणे शहरात हे हॉटेल बांधले. ते 1949 मध्ये पुणे येथे राहण्यासाठी आले. त्यानंतर त्यांनी व्यवसायात झेप घेतली. 1951 मध्ये पुणे शहरात एकाच वेळी तीन हॉटेल सुरु केल्यात. त्यात हॉटेल रुपाली, वैशाली आणि आम्रपाली यांचा समावेश आहे. पुणेकरांमध्ये दक्षिण भारतीय पदार्थ लोकप्रिय करण्याचे काम जगन्नाथ शेट्टी यांनी केले. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन अनेक सामाजिक संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यात त्रिदल संस्थेने त्यांना “पुण्यभूषण पुरस्कार” दिला. या हॉटेलमधील पदार्थांचा स्वाद शरद पवार, राज ठाकरे यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी घेतला आहे.

Follow Us
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.