AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Firing : पुण्यात पुन्हा गोळीबार, उरूळी कांचनमधील इनामदार वस्तीजवळ थरार

Pune Firing crime news : पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. पुण्यातील उरूळी कांचन येथे गोळीबाराची घटना समोर आली आहे. कोणी आणि का केला गोळीबार जाणून घ्या.

Pune Firing : पुण्यात पुन्हा गोळीबार, उरूळी कांचनमधील इनामदार वस्तीजवळ थरार
नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
| Updated on: Sep 14, 2024 | 4:26 PM
Share

पुण्यातील उरूळी कांचनमध्ये इनामदार वस्तीजवळ येथे गोळीबाराची घटना घडली आहे. बापू शितोळे याने तीन ते चार जणांवर गोळीबार केल्याची माहिती समजत आहे. या गोळीबारामध्ये काळुराम गोते हे गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्याचं काम सुरू आहे. या घटनेमुळे पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.

विद्येचे माहेरघर आणि सास्कृतिक राजधानी असलेली पुण्याची ओळख आता संपत चालली आहे. देशासह जगभरातून पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. मात्र आता दिवसाढवळ्या अशा गोळीबाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत ठेवूनच आता फिरावं लागत आहे. कोण कधी कुठे कोणावरही गोळीबार किंवा कोयत्याने हल्ला करेल काही सांगता येत नाही. आता मागे पुण्याचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची घराजवळ  निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.  घरातील संपत्तीच्या वादातून त्यांच्या बहिणीच्या पतीने सुपारी देत हत्या केली.

पुण्यातील नाना पेठमधील डोके तालीमजवळ रात्री नऊच्या सुमारास आपल्या भावासोबत उभे असलेल्या वनराज आंदेकर यांच्यावर 10-12 हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. सुरूवातील गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने हल्ल करत जागेवरच त्यांना संपवलं. या घटनेला एक महिनाही झाला नाहीतकर उरूळी कांचन येथे गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.

दरम्यान, पुण्यातील गुडांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. गणेशोत्सव सुरू असताना अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.