लग्न सोहळ्यापूर्वी राडा, गोळीबारात वधूच्या काकांचा मृत्यू, वऱ्हाडींनी बुकलून आरोपीचाही जीव घेतला

वधू पक्षाच्या लोकांना धमकावत विजेंदर सिंगने गोळीबार सुरू केला. यापैकी एक गोळी सुरेश लोढा यांना लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले. कुटुंबीयांनी काकांना जिल्हा आरबीएम रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

लग्न सोहळ्यापूर्वी राडा, गोळीबारात वधूच्या काकांचा मृत्यू, वऱ्हाडींनी बुकलून आरोपीचाही जीव घेतला
लग्न समारंभात दोन हत्याImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 11:56 AM

जयपूर : राजस्थानच्या (Rajasthan Crime News) भरतपूरमध्ये लग्न समारंभात (Wedding Ceremony Murder) बाईकच्या वेगावरुन गोंधळ उडाला. भरधाव वेगात मोटारसायकल चालवणाऱ्या तरुणाला आधी काही लोकांनी कानफटात लगावली. याच्या विरोधात तरुणाच्या कुटुंबीयांनी गोळीबार (Firing) केला. ही गोळी थेट वधूच्या काकांना लागली. यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी गोळीबार करणाऱ्या तरुणाचा बेदम मारहाण करुन जीव घेतला. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

काय आहे प्रकरण?

अमरसिंह यांच्या मुलीची वरात कुम्हेर पोलीस स्टेशन हद्दीतील बाबैन गावात येणार होती. आनंदाच्या वातावरणात संपूर्ण कुटुंब लग्नाच्या तयारीत मग्न होते. त्यानंतर गावातील उपसरपंच ललिता देवी यांचा मुलगा सुमित राजपूत हा बाईकवरुन भरधाव वेगाने तिथे फिरत होता. त्यामुळे लग्नाच्या तयारीत अडचणी येऊ लागल्या. वधूचे काका सुरेश लोढा यांनी सुमितला बाईक चालवण्यापासून रोखले.

यावरुन दोघांमध्ये वाद झाला. प्रकरण इतके वाढले की सुरेश लोढा यांनी सुमितच्या कानशिलात लगावली. ही बाब सुमितचे वडील विजेंदर सिंग यांना कळताच ते संतापले आणि त्यांनी काही साथीदारांसह बंदूक घेऊन घटनास्थळ गाठले.

हे सुद्धा वाचा

तरुणाच्या वडिलांचा गोळीबार

वधू पक्षाच्या लोकांना धमकावत विजेंदर सिंगने गोळीबार सुरू केला. यापैकी एक गोळी सुरेश लोढा यांना लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले. कुटुंबीयांनी काकांना जिल्हा आरबीएम रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तरुणाची काठ्यांनी मारुन हत्या

दुसरीकडे या घटनेने संतप्त झालेल्या सुरेशच्या कुटुंबीयांनीही विजेंद्रला पकडून काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्याचे नातेवाईकही त्याला रुग्णालयात घेऊन गेले, तिथे त्यालाही डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या प्रकरणी पोलीस अधीक्षक श्याम सिंह यांनी सांगितले की, गावात दोन पक्षांमध्ये गोळीबार झाला होता. ज्यामध्ये दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी एका सदस्याचा मृत्यू झाला. गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर कडेकोट बंदोबस्तात शहरातील मॅरेज होममध्ये रात्री उशिरा तरुणीचा विवाह पार पडला.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.