AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nuh violence | गाड्या पेटवल्या, घरं-दुकान जाळण्याचा प्रयत्न, कलम 144 लागू, नूंहमध्ये कशामुळे भडकला हिंसाचार?

Nuh violence | प्रक्षोभक जमावाने गाड्यावर दगडफेक केली. राज्य सरकारने आता मेवात, गुरुग्राम, फरीदाबाद आणि रेवाडीमध्ये कलम 144 लागू केलय. लोकांना शांतता राखण्याच आवाहन करण्यात येतय.

Nuh violence | गाड्या पेटवल्या, घरं-दुकान जाळण्याचा प्रयत्न, कलम 144 लागू, नूंहमध्ये कशामुळे भडकला हिंसाचार?
Nuh violenceImage Credit source: PTI
| Updated on: Aug 01, 2023 | 9:20 AM
Share

नूंह : हरियाणाच्या नूंहमध्ये सोमवारी एका धार्मिक यात्रेदरम्यान हिंसाचार भडकला. यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. नूंहमध्ये हिंसाचारादरम्यान दोन होमगार्ड आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला. नूंहमधील हिंसाचाराची आग आसपासच्या भागात पसरली. चार जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन केंद्राकडून अतिरिक्त सुरक्षा पथक पाठवण्यात आली आहेत. आज मंगळवारी काही भागात शाळा-कॉलेजेस बंद आहेत. हा हिंसाचार कसा परसरला, त्या बद्दल अपडेट जाणून घ्या.

हरियाणाच्या नूंहमध्ये सोमवारी विश्व हिंदू परिषदेकडून बृज मंडल जलभिषेक यात्रा काढली होती. या यात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून लोक यात्रेत सहभागी होण्यासाठी येथे आले होते. नूंहमधूनच वादाला सुरुवात झाली. भाजपा जिल्हाध्यक्ष गार्गी कक्कड़ यांनी गुरुग्रामच्या सिविल लाइंस भागातून यात्रेला हिरवा झेंडा दाखवला.

एका सुमदायाच्या लोकांचा विरोध

या यात्रेत मोनू मानेसर सहभागी होणार अशी बातमी आली. नासिर-जुनैद हत्या प्रकरणात तो फरार आहे. त्यानंतर नूंहमध्ये एका सुमदायाच्या लोकांनी विरोध सुरु केला. दगडफेक केली. दोन्ही बाजूच्या गटांकडून दगडफेक सुरु झाली.

विश्व हिन्दू परिषदेची यात्रा

दुपारी सुरु झालेल्या या हिंसाचारात दोन होमगार्ड आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला. 15 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. जखमी पोलिसींवर मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. विश्व हिन्दू परिषदेची यात्रा रोखण्यासाठी जमावाने दगडफेक केली. त्यावरुन मोठा राडा झाला. गाडया पेटवण्यात आल्या. दुकान, घर जाळण्याचा प्रयत्न झाला. नूंहमध्ये हिंसाचार भडकल्यानंतर केंद्राकडून अतिरिक्त सुरक्षा पथक पाठवण्यात आली.

कुठल्या जिल्ह्यात कलम 144 लागू ?

नूंहला लागून असलेल्या सोहना भागातही राडा झाला. तिथे प्रक्षोभक जमावाने गाड्यावर दगडफेक केली. राज्य सरकारने आता मेवात, गुरुग्राम, फरीदाबाद आणि रेवाडीमध्ये कलम 144 लागू केलय. लोकांना शांतता राखण्याच आवाहन करण्यात येतय. इंटरनेट सेवा बंद

दोन गटांमध्ये झालेला जोरदार हिंसाचार आणि राड्यानंतर आता सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. नूंह आणि फरीदाबादमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्याशिवाय फरीदाबादमध्ये एक ऑगस्टला सर्व सरकारी, प्रायवेट शाळा बंद आहे. गुरुग्राम-पलवलमध्ये सुद्धा शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.