Sangli Suicide : सांगली हादरलं! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास केला जातो. संपूर्ण सांगली या घटनेने हादरली आहे. विष पिऊन कुटुंबातील 9 सदस्यांनी आतम्हत्या केल्याची बातमी समोर आली आहे.

Sangli Suicide : सांगली हादरलं! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं
सांगली हादरलं! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 3:04 PM

सांगली : एकाच कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या (Sangli Family Suicide) केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून 9 जणांनी आत्महत्या केली आहे(Financial Problem). सांगलीतल्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये (Miraj Family Suicide) ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास केला जातो. संपूर्ण सांगली या घटनेने हादरली आहे. विष पिऊन कुटुंबातील 9 सदस्यांनी आतम्हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या कुटुंब हे एका पशुवैद्यकीय डॉक्टरचं होतं. या डॉक्टरशी बराचवेळ फोनवरुन संपर्क केला जात होता. मात्र संपर्क होऊ न शकल्यानं संशय व्यक्त करण्यात आला. तसंच सकाळी उशिरापर्यंत घराचा दरवाजाही उघडण्यात आलेला नव्हता. त्यामुळे दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल फोनवरुन सातत्यानं संपर्क करण्याचाही प्रयत्न केला. मात्र कुणीच फोन उचलला नाही.

ग्रामस्थांनी पाहणी केल्यानंतर प्रकार समोर

अखेर ग्रामस्थांनी घरात जाऊन पाहणी केल्यानंतर धक्कादायक चित्र समोर दिसलं. डॉक्टरांच्या कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले. तर त्यांच्या भावाच्या घरातील तिघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं. विष घेऊन या सगळ्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मिरज ग्रामीण पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा आता कसून तपास केला जातो.

आत्महत्या का केली?

आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केली गेली असावी, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र या घटनेनं संपूर्ण म्हैसाळ गावासह सांगली जिल्हा हादरुन गेलाय. पोलिसांकडून या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्याची प्रक्रिया केली जातेय. पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट आल्यानंतर याबाबत अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनाही पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

कुणी केली आत्महत्या?

आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाचं नाव वनमोरे असून दोन भावांनी आपलं अख्खं कुटुंब संपवलंय. या आत्महत्येनं खळबळ माजलीय. माणिक वनमोरे आणि पोपर वनमोरे असं आत्महत्या केलेल्या दोघा भावांची नावं आहे. ज्यांचे मृतदेह आढळून आलेत, त्यात या दोघा भावांसह आई, पत्नी आणि मुलांचा समावेशही आहे.

कुठे आहे म्हैसाळ?

म्हैसाळ गाव हे सांगली जिल्ह्यातील मिरज गावात आहे. मिरज तालुक्यापासून 12 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे. आत्महत्या केलेले दोघेही सख्खे भाऊ आहे. म्हैसाळ गावातील अंबिकानगरमध्ये ही घटना उघडकीस आल्यानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

मृतांची नावं पुढीलप्रमाणे

डॉक्टर माणिक येलाप्पा वनमोरे आक्काताई वनमोरो, माणिक वनमोरे यांची आई रेखा माणिक वनमोरे, माणिक वनमोरे यांची बायको प्रतिमा वनमोरे, माणिक वनमोरे यांची कन्या आदित्य वनमोरे, माणिक वनमोरे यांचा मुलगा पोपट येलाप्पा वनमोरे, माणिक वनमोरे यांचे सख्खे भाऊ अर्चना वनमोरे, पोपट वनमोरे यांची पत्नी संगिता वनमोरे, पोपट वनमोरे यांचा यांची मुलगी शुभम वनमोरे, पोपट वनमोरे यांचा मुलगा

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.