AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फसवणुकीचा आणखी एक नवा फंडा, ते भामटे भक्त दुकांदारांनाचा गंडवतात, पहा कसं…

दुकानातून वस्तूंची खरेदी केल्यानंतर या ॲपच्या माध्यमातून ट्रान्झक्शन आयडी तयार करून पेमेंट झाल्याची पावती दुकानदारांना दाखवून त्यांची फसवणूक केली जात आहे.

फसवणुकीचा आणखी एक नवा फंडा, ते भामटे भक्त दुकांदारांनाचा गंडवतात, पहा कसं...
Image Credit source: Google
| Updated on: Nov 12, 2022 | 1:46 PM
Share

नाशिक : डिजिटल व्यवहार करत असतांना काही भामटे यामध्ये फसवणूक करत असल्याचा एक नवीन प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. नाशिकच्या दुकानदारांना ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांपैकी बनावट व्यवहार केल्याचे समोर आले आहे. खरंतर या फसवणुकीच्या घटणेने पोलीसही चक्रावून गेले असून गुन्हेगाराचा शोध घ्यायचा तरी कसा ? असा प्रश्न नाशिकच्या सायबर पोलीसांसमोर निर्माण झाला आहे. डिजिटल इंडियाचा नारा देत असतांना डिजिटल व्यवहार करावे यासाठी सरकारकडून प्रोत्साहित केले जात आहे. पण त्यातही फसवणूक होत असल्याने चिंता वाढत चालली आहे. अशातच नाशिकमधील काही दुकानदारांना बनावट व्यवहार दाखवत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार करण्यावर भर दिला जात असतांना फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे.

त्यानुसार छोटे-मोठे सर्वच व्यावसायिक ऑनलाईन व्यवहाराला प्राध्यान्य देत असून पाच ते दहा रुपयांपासून हे व्यवहार केल्याचे दिसून येत आहे.

यासाठी नागरिकांकडून फोन पे, गुगल पे, पेटीएम, ॲमेझान पेसारखे ऑनलाइन पेमेंट ॲपचा वापर केला जात असून प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये हे ॲप दिसून येत आहे.

पेटीएम स्पूफ, प्रंक पेमेंट व फेक पे यांसारख्या काही ॲपच्या माध्यमातून बनावट व्यवहार तयार करून दुकानदारांची, व्यापाऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत.

दुकानातून वस्तूंची खरेदी केल्यानंतर या ॲपच्या माध्यमातून ट्रान्झक्शन आयडी तयार करून पेमेंट झाल्याची पावती दुकानदारांना दाखवून त्यांची फसवणूक केली जात आहे.

फोन पे, गुगल पे आणि पेटीएमध्ये ज्या पद्धतीने पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनवर मेसेज येतो त्याच पद्धतीचा मेसेज या फेक ॲपवरही दिसून येताे. त्यामुळे दुकानदारांना लवकर हा प्रकार लक्षात येत नाही.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.