AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापलेकात वाद झाला, दोघेही शांत झाले म्हणून आई बाजूला गेली, परत येऊन पाहते तर पायाखालची जमीनच सरकली !

बापलेकामध्ये जमिनीचा वाद टोकाला गेला. दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि काही वेळाने दोघे शांतही झाले. यानंतर आई निघून गेली अन् परत आली तर तिला धक्काच बसला.

बापलेकात वाद झाला, दोघेही शांत झाले म्हणून आई बाजूला गेली, परत येऊन पाहते तर पायाखालची जमीनच सरकली !
कौटुंबिक वादातून सासऱ्याने सुनेला संपवले
| Updated on: Jun 18, 2023 | 12:51 PM
Share

अजमेर : राजस्थानमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून मुलाने बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील अजमेर येथे घडली आहे. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरुन मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. बेगाराम असे मयत पित्याचे नाव असून, मुकेश असे आरोपी मुलाचे नाव आहे. पाली जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जमिनीचा वाद टोकाला गेला अन्…

बाप-बेट्यामध्ये आईसमोरच जमिनीवरुन वाद झाला. काही वेळाने वाद शांत झाला, म्हणून आई तिथून गेली. थोड्या वेळाने परत आली तर समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. महिलेचा पती जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तिने तात्काळ पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

पोलिसांकडून आरोपी ताब्यात

पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली असता, महिलेने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. बाप-लेकामध्ये जमिनीवरुन वाद झाला होता. त्यामुळे मुलाने दारुच्या नशेत बापाची हत्या केली असावी, अशी शंका महिलेने पोलिसांकडे व्यक्त केली. यानंतर पोलिसांनी फरार झालेल्या मुलाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.