आजारपणाला कंटाळून विवाहितेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

| Updated on: Sep 04, 2021 | 11:11 AM

आजारपणाला कंटाळून विवाहितेने चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना श्रीरामपूरमध्ये उघडकीस आली आहे. श्रीरामपूरच्या टाकळीमियात ही घटना घडलीय. मायलेकीच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आजारपणाला कंटाळून विवाहितेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
Follow us on

अहमदनगर : आजारपणाला कंटाळून विवाहितेने चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना श्रीरामपूरमध्ये उघडकीस आली आहे. श्रीरामपूरच्या टाकळीमियात ही घटना घडलीय. मायलेकीच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आजारपणाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

विद्या दिलीप कडु (वय 25) आणि सिध्दी दिलीप कडु (वय 4) असे आत्महत्या केलेल्या मायलेकीचे नाव आहे. विद्या ही शाळेत असल्यापासून थोडीशी मनोरुग्ण होती.  तिला तेव्हापासून औषधोपचार चालु होते.

विद्याची श्रीरामपूर येथील दवाखान्यात मासिक ट्रिटमेंट चालू होती. या आजारामुळे ती सुमारे तीन वर्षापासून टाकळीमिया येथे माहेरी राहत होती. विद्या ही या औषधोपचार आणि इंजेक्शनला पूर्णपणे वैतागली होती. तिने संधी साधून आपल्या लहान चिमुकलीला घेऊन जवळच असलेल्या विहीरीत उडी घेत आत्महत्या केलीय.

नाशिकमध्ये बाळाची हत्या करुन आईची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं…

बाळाची हत्या करुन आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. महिलेसोबतच बाळाचाही मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र महिलेच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. बाळाची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
आत्महत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली आहे. मात्र सुसाईड नोटमध्ये या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असा उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे.

दोन मुलांच्या हत्येनंतर आईची आत्महत्या

दरम्यान, दोन चिमुकल्या मुलांची हत्या करुन महिलेने गळफास घेतल्याची घटना नुकतीच राजस्थान राज्यातील बाडमेरमध्ये उघडकीस आली होती. सहा वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांच्या मुलाचा जीव घेऊन विवाहितेने स्वतःचंही आयुष्य संपवलं. हुंड्याच्या दबावातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून बहिणीने सामूहिक आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. पोलिसांनी तिघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून पुढील तपास सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यातील वाकलपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली होती. रसाल कंवर हिचा विवाह सात वर्षांपूर्वी माधव सिंहसोबत झाला होता. माधव ट्रक चालक आहे. माधव आणि रसाल यांना सहा वर्षांची जसू ही मुलगी आणि तीन वर्षांचा विक्रम हा मुलगा आहे. शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत जेव्हा रसाल कंवरच्या घरातून कुठलीही हालचाल जाणवली नाही, त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून घरात डोकावून पाहिलं असता, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रसाल आणि तिची दोन्ही मुलं गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.

(Suicide married Women Due To illness maharashtra Shrirampur Ahmednagar)

हे ही वाचा :

27 गुन्हे नावावर असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या अहमदनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या

तथाकथित सामाजिक कार्यकर्ता अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणी वाढल्या, पत्नी रुपालीचे खळबळजनक आरोप

महिलांना दहा जणांची लाथाबुक्क्यांनी मारहाण, रिक्षाचालकाचा प्रताप!