AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Police : ठाणे पोलिसांचा स्तुत्य उपक्रम, गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला 58 लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत

सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहन, मोबाईल चोरी अशा एकूण 59 गुन्ह्यातील मुद्देमालाचा समावेश होता. तर परिमंडळ एक अंतर्गत असलेल्या वर्तकनगर पोलिसांनी देखील 35 लाखांहूनचा अधिक जप्त मुद्देमाल तक्रादारांना परत केला. त्यात 35 मोबाईल, मोटारसायकल, सोनसाखळी व रोकड अशा मुद्देमालाचा समावेश होता. 58 लाखाचा मुद्देमाल अनेक गुन्ह्यातून जमा झाला होता.

Thane Police : ठाणे पोलिसांचा स्तुत्य उपक्रम, गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला 58 लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत
विविध गुन्ह्यामध्ये हस्तगत केलेला मुद्देमाल तक्रारदारांना परत करताना ठाणे परिमंडळ -5 चे उपायुक्त डॉ . विनय राठोड व आदीImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 17, 2022 | 10:22 PM
Share

ठाणे : यंदाचा स्वातंत्र्य (Amrit Mahotsav) अमृत महोत्सव विविध उपक्रमाने साजरा करण्यात आलेला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत वेगळेपण दाखवण्यात आले होते. (Thane Police) ठाणे पोलीसांनीही असाच उपक्रम राबवला असून त्याची चर्चा आता सर्वत्र सुरु आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयतर्फे विविध गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल (Back to the complainants) तक्रारदारांना परत करण्यात आलेला आहे. तब्बल 58 लाख 89 हजार 569 इतक्या किमतीचा मुद्देमाल तक्रारदार यांना परत केला गेला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयतर्फे विविध गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल परत करण्यासाठी मुद्देमाल अभिहस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदारांमधून तर समाधान होत आहेच पण अमृत महोत्सवी अनेकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याची भावना नागरिकांची झाली होती.

न्यायालयाच्या आदेशाने माल परत

तक्रारदारांना त्यांचा माल परत करण्यासंदर्भातील सर्व प्रक्रिया ही पोलीस प्रशासनाने पूर्ण केली. त्यानंतरच या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. शहर पोलीस दलातील पाच परिमंडळात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून न्यायालयाच्या आदेशान्वये तक्रारदारांना त्यांच्या मालकीचा मुद्देमाल परत करण्यात आला. यावेळी परिमंडळ एकच्या पोलिसांनी विविध गुन्ह्यांमधून हस्तगत केलेला एकूण 58 लाख 89 हजार 569 इतक्या किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला.

या गु्न्ह्यामध्ये झाली होती कारवाई

सोनसाखळी चोरी, घरफोडी, वाहन, मोबाईल चोरी अशा एकूण 59 गुन्ह्यातील मुद्देमालाचा समावेश होता. तर परिमंडळ एक अंतर्गत असलेल्या वर्तकनगर पोलिसांनी देखील 35 लाखांहूनचा अधिक जप्त मुद्देमाल तक्रादारांना परत केला. त्यात 35 मोबाईल, मोटारसायकल, सोनसाखळी व रोकड अशा मुद्देमालाचा समावेश होता. 58 लाखाचा मुद्देमाल अनेक गुन्ह्यातून जमा झाला होता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा मुद्देमाल देण्यात आला आहे. यामध्ये पोलीसांचेही अथक परीश्रम कामी आले आहेत.

तक्रारदारांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद

चोरी झालेल्या वस्तूंच्या किंमतीपेक्षा त्या वस्तूचे वेगळेच महत्व असते. आणि एकदा का चोरी झाली म्हणले की ती वस्तू परत मिळेलच असे काही नसते. पण ठाणे पोलीस आयुक्तालयतच्या सर्वच पोलीसांनी यासाठी अथक परिश्रम घेतले होते. शिवाय अनेक दिवसानंतर चोरीला गेलेला मुद्देमाल आपल्या हाती परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी मुद्देमाल अभिहस्तांतरण कार्यक्रमाला ठाणे परिमंडळ -5 चे उपायुक्त डॉ . विनय राठोड उपस्थित होते.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.