AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुरट्या चोरांमुळे नाशिकचे शेतकरी त्रस्त, बाजारभाव तेजीत असलेल्या पिकाची चोरी

अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन काही पिकांना या विपरित परिस्थितीही वाचवून पीक वाचवली आहे.

भुरट्या चोरांमुळे नाशिकचे शेतकरी त्रस्त, बाजारभाव तेजीत असलेल्या पिकाची चोरी
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 25, 2022 | 2:10 PM
Share

Nashik Crime : नाशिकच्या शेतकऱ्यांसमोर (Nashik Farmer) आता नवीन संकट उभे राहिले आहे. आधीच अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला आलेल्या असल्याने पुन्हा शेतकरी भीतीच्या सावटाखाली आलेला आहे. मुसळधार (Heavy Rain) पावसाने शेतकऱ्याच्या शेतमालचे नुकसान झाले होते. त्यात कसाबसा वाचविलेला शेतमाल दोन पैसे मिळवून देणारा ठरत असल्याने त्यावरच चोरडे डल्ला मारत आहे. त्या विशेष म्हणजे टोमॅटोला बाजारात चांगला भाव मिळत असल्याचे पाहून भुरटे चोर रात्रीच्या वेळी टोमॅटो चोरी करत आहे. नाशिकच्या परिसरात टोमॅटो काढणी सुरू आहे. त्यात शेतात काढणीला आलेल्या टोमॅटोची चोरी होत असल्याची घटना मखमलाबाद शिवारात घडली आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने शेतकऱ्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अनेकदा याबाबत तक्रार देऊनही चोर हाती लागत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.

अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन काही पिकांना या विपरित परिस्थितीही वाचवून पीक वाचवली आहे.

त्यातमध्ये टोमॅटो या शेतपिकाला सध्या चांगला बाजारभाव मिळत आहे. मार्केटमध्ये ७०० ते ८०० रुपयांना प्रतिजाळी म्हणजेच कॅरेटला विकली जातेय.

नाशिकच्या मखमालाबाद परिसरासह दिंडोरी, सिन्नर आणि पिंपळगाव परिसरात मोठ्या टोमॅटो पिकाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे या परिसरात चोरांनी लक्ष केले आहे.

टोमॅटो पीक सध्या काढणीला आले आहे. त्यात दिवसभर शेतकरी आणि शेतमंजूर हे टोमॅटो काढतात, आणि शेतातच टोमॅटोचे कॅरेट भरून ठेवतात, आणि पहाटे मालवाहतूक वाहनाने बाजार नेतात.

अशी पद्धत ही सर्वत्र असते, यंदाच्या वर्षी शेतीमालाचे नुकसान झाल्याने टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे, आणि हीच संधी शोधून भुरटे चोर टोमॅटोची चोरी करत आहे.

या चोरीच्या घटनेमुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसंत असून या चोरीबाबत ज्ञानेश्वर पिंगळे, शंकर पिंगळे यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मखमलाबाद शिवारात टोमॅटो चोरीच्या घटना थांबलेल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करत आहे, याबाबत पोलिसांनी तातडीने या भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.