AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोटरसायकल,रिक्षा, टेम्पो, रोख रक्कम,आणि शेकडो मोबाईल्स…कुठे सापडला कोट्यवधींचा माल ?

मौल्यवान वस्तू हरवल्यामुळे किंवा चोरीला गेल्यामुळे हे नागरिक हताश झाले होते, त्यांचे मोठे नुकसान झाले. हा मुद्देमाल आपल्याला परत मिळेल,अशी अपेक्षा त्यांनी सोडून दिली होती.

मोटरसायकल,रिक्षा, टेम्पो, रोख रक्कम,आणि शेकडो मोबाईल्स...कुठे सापडला कोट्यवधींचा माल ?
| Updated on: Oct 14, 2023 | 3:42 PM
Share

उल्हासनगर | 14 ऑक्टोबर 2023 : नवरात्रोत्सवाचा सण आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला. संपूर्ण देश या उत्सवासाठी उत्सुक आहे. दरम्यान उल्हासनगर (ulhasnagar) पोलीसांच्या वतीने नागरिकांना नवरात्रोत्सवानिमित्त अनोखी भेट देण्यात आली आहे. उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या दोन वर्षात झालेल्या चोरीच्या अनेक प्रकरणांचा पोलिसांनी छडा लावला.उल्हासनगर पोलीस परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या ८ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरवलेला १ कोटी ११ हजारांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला . यामध्ये मोटरसायकल,रिक्षा, टेम्पो तसेच रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने आणि तब्बल ३२३ मोबाईल्सचा समावेश आहे.

यावेळी पोलिसांनी चोरीचे अनेक गुन्हे उघड केले आणि सापडलेल्या वस्तू त्यांच्या मालकांकडे सुपूर्द करण्यात आल्या. उल्हासनगरच्या टाऊन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार आणि पोलीस यांच्या हस्ते हा सगळा मुद्देमाल समारंभपूर्वक परत करण्यात आला.

शेकडो मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने आणि बरंच काही…

यामध्ये ४४ लाख ४८ हजार ६२५ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, ६ लाख १६ हजार ६२० रुपये रोख रक्कम, ८ लाख ८२ हजाराची विविध वाहने, ४२ लाख ३ हजार ४९ रुपयांचे एकूण ३२३ मोबाईल इत्यादी मुद्देमालाचा समावेश आहे. सर्व मिळून एकूण तब्बल १ कोटी ४१ हजारांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केल्याची माहिती सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली.

मौल्यवान वस्तू हरवल्यामुळे किंवा चोरीला गेल्यामुळे हे नागरिक हताश झाले होते, त्यांचे मोठे नुकसान झाले. हा मुद्देमाल आपल्याला परत मिळेल,अशी अपेक्षा त्यांनी सोडून दिली होती. मात्र पोलिसांनी हा माल जप्त करत ज्याची-त्याची वस्तू त्याला परत दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आमच्या वस्तू परत मिळाल्याने सुखद धक्का बसला, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले. तसेच उल्हासनगर शहरात गेल्या काही दिवसात वाहनचोरी, मोबाईल चोरी या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पोलिसांकडून आरोपींना जरब बसवली जावी, अशी मागणीही केली जात आहे.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.