AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather : राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेती पिकांना मोठा फटका

Maharashtra weather : राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस झाला आहे. अवकाळी पाऊस अनेक जिल्ह्यात झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय वाईट ठरला आहे.

Weather : राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेती पिकांना मोठा फटका
unseasonal rain Image Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 22, 2023 | 11:44 AM
Share

पुसद : पुसद (pusad) तालुक्यात प्रचंड वादळी वारे व गारपीट व मुसळधार पावसाने (unseasonal rain) थैमान घातले असून परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पुसद परिसरात दिवसभर उष्ण वातावरण होतं. अचानक संध्याकाळी सुमारे साडेचारच्या सुमारास प्रचंड वादळी वारे व मेघगरजेनेसह पावसाला सुरुवात झाली. माळ पठारावरील अनेक गावात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. हळद उत्पादक शेतकरी (Turmeric producing farmer) हवालदिल झालेला असून भाजी वर्गीय पीक घेणारे शेतकरी मात्र पुरते पीक नष्ट झाल्याने हतबल झाले आहे. माळ पठारावरील रोहडा येथील विठ्ठल किसन पोपळघट यांच्या सुमारे 25 एकरातील तीळ, उडीद, टरबूज आणि टमाटे ही पिके सुमारे पाच मिनिटे पडलेल्या गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेली आहेत.

टमाट्याचे व हळदीचे प्रचंड नुकसान

गजानन तुकाराम पांगसे यांच्या सुमारे 18 ते 19 एकर जमिनीत फळभाजी पिकांचे याच प्रकारे नुकसान झाले असून गावातील दत्ता पोपळघट, गोविंद पोपळघट ,रामकिसन कानडे,रामजी भोने ,विठ्ठलराव वाढवे तसेच हळद उत्पादक राजकुमार परिस्कर यांचे टमाट्याचे व हळदीचे प्रचंड नुकसान झाले असून सचिन हरीमकर, गजानन हरीमकर यांचे सुद्धा त्याच प्रकारे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील चिकणी, हुडी या गावात व परिसरात सुद्धा वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला असून तालुक्यातील आंबा व लिंबू तसेच संत्रा पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. हीच परिस्थिती तालुक्यातील भोजला, वनवारला, वालतुर, पार्डि, निंबी याही भागात झाली असून शेतकऱ्यांच्या या प्रचंड नुकसानामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. तालुक्यातून नगदी पैसे देणारा आंबा उत्पादक शेतकरी या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे हतबल झाला असून सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने खरिपातील दुष्काळ आणि रब्बीतील हे नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी प्रचंड प्रमाणात हवालदिल झाला असून शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी अशी मागणी अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे.

राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस झाला आहे. अवकाळी पाऊस अनेक जिल्ह्यात झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय वाईट ठरला आहे.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?