AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather : राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेती पिकांना मोठा फटका

Maharashtra weather : राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस झाला आहे. अवकाळी पाऊस अनेक जिल्ह्यात झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय वाईट ठरला आहे.

Weather : राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेती पिकांना मोठा फटका
unseasonal rain Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 22, 2023 | 11:44 AM
Share

पुसद : पुसद (pusad) तालुक्यात प्रचंड वादळी वारे व गारपीट व मुसळधार पावसाने (unseasonal rain) थैमान घातले असून परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पुसद परिसरात दिवसभर उष्ण वातावरण होतं. अचानक संध्याकाळी सुमारे साडेचारच्या सुमारास प्रचंड वादळी वारे व मेघगरजेनेसह पावसाला सुरुवात झाली. माळ पठारावरील अनेक गावात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. हळद उत्पादक शेतकरी (Turmeric producing farmer) हवालदिल झालेला असून भाजी वर्गीय पीक घेणारे शेतकरी मात्र पुरते पीक नष्ट झाल्याने हतबल झाले आहे. माळ पठारावरील रोहडा येथील विठ्ठल किसन पोपळघट यांच्या सुमारे 25 एकरातील तीळ, उडीद, टरबूज आणि टमाटे ही पिके सुमारे पाच मिनिटे पडलेल्या गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेली आहेत.

टमाट्याचे व हळदीचे प्रचंड नुकसान

गजानन तुकाराम पांगसे यांच्या सुमारे 18 ते 19 एकर जमिनीत फळभाजी पिकांचे याच प्रकारे नुकसान झाले असून गावातील दत्ता पोपळघट, गोविंद पोपळघट ,रामकिसन कानडे,रामजी भोने ,विठ्ठलराव वाढवे तसेच हळद उत्पादक राजकुमार परिस्कर यांचे टमाट्याचे व हळदीचे प्रचंड नुकसान झाले असून सचिन हरीमकर, गजानन हरीमकर यांचे सुद्धा त्याच प्रकारे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील चिकणी, हुडी या गावात व परिसरात सुद्धा वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला असून तालुक्यातील आंबा व लिंबू तसेच संत्रा पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. हीच परिस्थिती तालुक्यातील भोजला, वनवारला, वालतुर, पार्डि, निंबी याही भागात झाली असून शेतकऱ्यांच्या या प्रचंड नुकसानामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. तालुक्यातून नगदी पैसे देणारा आंबा उत्पादक शेतकरी या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे पूर्णपणे हतबल झाला असून सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने खरिपातील दुष्काळ आणि रब्बीतील हे नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी प्रचंड प्रमाणात हवालदिल झाला असून शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी अशी मागणी अनेक शेतकऱ्यांकडून होत आहे.

राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस झाला आहे. अवकाळी पाऊस अनेक जिल्ह्यात झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी अतिशय वाईट ठरला आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.