AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या पहिल्या रात्री नववधू बोलली, ‘मी तुझ्या मुलाची…’, ते ऐकताच नवरदेवाने उचललं टोकाचं पाऊल

एकमेकाला समजून गोडी गुलाबीने संसार करायचा असतो. पण काही व्यक्ती याला अपवाद असतात. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या डोक्यात संशयाच भूत असतं. यातून संसार बहरण्याऐवजी उलट नातं तुटायला सुरुवात होतं.

लग्नाच्या पहिल्या रात्री नववधू बोलली, 'मी तुझ्या मुलाची...', ते ऐकताच नवरदेवाने उचललं टोकाचं पाऊल
Marriage Image Credit source: File photo
| Updated on: Feb 04, 2025 | 11:15 AM
Share

पती-पत्नीचा नातं विश्वासाच असतं. हाच या नात्याचा आधार-पाया असतो. तुमचं लग्न होतं, तेव्हा बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्या असतात. एकमेकाला समजून गोडी गुलाबीने संसार करायचा असतो. पण काही व्यक्ती याला अपवाद असतात. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या डोक्यात संशयाच भूत असतं. यातून संसार बहरण्याऐवजी उलट नातं तुटायला सुरुवात होतं. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीच नववधूने असं सत्य सांगितलं की, नवरदेवाने तिची गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी आरोपी नवरदेव आणि त्याच्या आईला अटक केली आहे. या प्रकरणात अन्य पाच आरोपी फरार आहेत. अटकेनंतर पतीने जो खुलासा केला, त्याने पोलीसही हैराण झालेत.

उत्तर प्रदेशच्या बदायूंमधील हे प्रकरण आहे. अलापुर गावात राहणाऱ्या यादरामच्या मुलाचा नीरजचा शाहजहांपुरच्या रामनिवास यांच्या मुलीशी 22 जानेवारीला लग्न झालं. ज्या मुलीसोबत लग्न झालं, तिच्यासोबत नीरजचे आधीपासून प्रेमसंबंध होते. नात्यात असल्याने दोघांच लग्न लावण्यात आलं. दोघांमध्ये लग्नाआधीपासून शारीरिक संबंध होते. पण मुलीने ती गर्भवती असल्याच आधी सांगितलं नव्हतं.

‘लोकांनी टोमणे मारायला सुरुवात केली’

नीरजने पोलिसांना सांगितलं की, “लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीने मला सांगितलं की, ती अडीच महिन्याची गर्भवती आहे, तेव्हा मला धक्का बसला. मला विश्वासच बसला नाही. मी घरच्यांना या बद्दल सांगितलं. कुटुंबिय आणि आसपासच्या लोकांनी टोमणे मारायला सुरुवात केली. बरच काही माझ्याबद्दल बोललं जात होतं. ते मला सहन झालं नाही. त्यानंतर मी आईच्या साथीने पत्नीची गळा आवळून हत्या केली”

मुलीच्या वडिलांच म्हणणं काय?

रामनिवासने मुलीच्या मृत्यूनंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. हुंड्याची मागणी पूर्ण केली नाही म्हणून नवरा, सासू कांता, सासरा यादराम, दीर रवी, नणंद अंजू, काका लालाराम आणि दिनेश यांनी, माझ्या मुलीची गळा आवळून हत्या केली असा मुलीच्या पित्याचा आरोप आहे. पोलिसांनी पती आणि सासू कांता यांना अटक केली आहे. पाच आरोपी अजून फरार आहेत.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...