AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फावड्याने गळा कापला, जागीच ठार! पण हत्येनंतरही तो थांबला नाही, पुढची 10 मिनिटं त्याने…

गळ्यावर फावड्याने वार केला, तिचा जागीच जीव गेला. पण त्यानंतही तो थांबला नाही. पुढची 10 मिनिटं त्याने जे केलं, ते क्रूरतेचा कळस गाठणारं होतं!

फावड्याने गळा कापला, जागीच ठार! पण हत्येनंतरही तो थांबला नाही, पुढची 10 मिनिटं त्याने...
हत्यांकांड झालेलं ठिकाणImage Credit source: tv9 network
| Updated on: Sep 29, 2022 | 3:07 PM
Share

किरकोळ वादातून पतीने पत्नीची हत्या (Husband killed wife) केली. फावड्याने आपल्या पत्नीच्या गळ्यावर वार केला. पत्नी झोपेत असताना पतीने फावड्याने गळा चिरला. पत्नीने केलेला वार इतका जबर होता की पत्नीचा जागीच जीव गेला. पण यानंतरही माथेफिरु पती थांबला नाही. तिचा जीव गेल्यानंतरही पुढची 10 मिनिटं तो आपल्या पत्नीवर सपासप वार करत राहिला होता, अशी माहिती समोर आलीय. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात घडली. या हत्याप्रकरणी पोलिसांनी (UP crime News) आरोपी पतीसह हत्येसासाठी (Murder) वापरलेला फावडाही ताब्यात घेतलाय.

बाराबंकी जिल्ह्यातील सतरीख पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. जैनाबाद मजरे बबुरिहा या गावात हे हत्याकांड घडल्याचं उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडालं होतं. या गावात अजय कुमार आणि वर्षा हे दाम्पत्य राहत होते. 15 वर्ष त्यांनी एकमेकांसोबत संसार केला. त्यांना चार मुलं आहेत. पण संसारांत नवरा बायकोचा संवाद कमी आणि वादच जास्त होत होते, अशी माहिती आता उघडकीस आलीय.

छोट्या मोठ्या कारणावरुन त्यांच्या नेमकी खटके उडायचे. अजय वर्षाला छोट्या मोठ्या कारणावरुन सारखा छळायचा. कधी कधी मारपीटही करायचा. वर्षाने आपल्या माहेरी याबाबत सांगितलं होतं. पण माहेरच्यांनी संसारात सांभाळून घेण्याचा सल्ला दिला होता. तेव्हाच जर माहेरच्या लोकांनी वर्षाची तक्रार गांभीर्याने घेतली असती, तर आज ती जिवंत असती, अशी भावना आता तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलीय.

पाहा लाईव्ह घडमोडी : Video

एक दिवस नेहमीप्रमाणे वर्षा घरात झोपली होती. इतक्यात अजय आला. त्याच्याशी थोडीशी शाब्दिक चमक उडाली. किरकोळ भांडणाचा राग अजय कुमारच्या डोक्यात गेला. त्याने थेट फावडा उचलला आणि झोपलेल्या अवस्थेत असलेल्या वर्षाच्या गळ्यावर जोरदार प्रहार केला. हा प्रहार इतका जबर होता की वर्षाचा जागीच जीव गेला. धक्कादायक बाब म्हणजे वर्षाची हत्या केल्यानंतरही अजय पुढची 10 मिनिटं तिच्या गळ्यावर फावड्यानं वार करतच राहिला होता. यावरुन त्याच्या डोक्यात किती राग भरला होता, याची निव्वळ कप्लना केलेली बरी.

दरम्यान, गावातील लोकांना ही बाब कळली. त्यांनी तातडीने अजय कुमारचं घर गाठलं. संतप्त झालेल्या जमावाने अजयला पकडून चोप दिला. नंतर त्याचा पोलिसांच्या हवाले केलं. पत्नीची हत्या करुन दुसरा कुणातरी पळून गेला असता. पण अजय इतका माथेफिरु होता, की मेल्यानंतरही पत्नीच्या मृतदेहावर वार करत राहिला होता.

पोलिसांनी हत्याकांडाच्या या घटनेची गंभीर दखल घेतलीय. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती अजय कुमार याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवून घेतलाय. त्याला अटकही करण्यात आलीय. सध्या पुढील तपास केला जातो. संपूर्ण गाव या घटनेनं हादरुन गेलंय.

Follow Us
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.