AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहा वर्षीय मुलाचं अपहरण, 18 तासात सुटका, सोलापूर पोलिसांची कारवाई

खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाची सोलापूर शहर पोलिसांनी अवघ्या 18 तासात सुटका केली आहे.

सहा वर्षीय मुलाचं अपहरण, 18 तासात सुटका, सोलापूर पोलिसांची कारवाई
| Updated on: Nov 11, 2020 | 11:45 AM
Share

सोलापूर : खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाची सोलापूर शहर पोलिसांनी अवघ्या 18 तासात (Solapur Police Solve Kidnapping Case) सुटका केली आहे. सोलापूर शहरात शेजारच्या मुलाला अपहरण करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. सागर कृष्णप्पा गायकवाड असे अपहरणकर्त्या आरोपीचे नाव असून त्याला विजापूर नाका पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे (Solapur Police Solve Kidnapping Case).

सोलापूर शहरातील होडगी रोड परिसरात सोमवारी (9 नोव्हेंबर) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सहा वर्षीय दीपक कोळी याला ऊस देण्याचे आमिष आरोपी सागर गायकवाड याने त्याचे अपहरण केले. अपहरणानंतर सागर गायकवाड यांनी यशला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील आपल्या आजीकडे ठेवले.

दरम्यान, आपला मुलगा हरवल्यामुळे कोळी परिवारातील सदस्य चिंतेत होते. त्यांनी आपल्या मुलाचा शोधाशोध सुरु केला होता. तर इकडे आरोपीने फोन करुन त्यांच्याकडे तब्बल पाच लाखाची खंडणी मागितली.

यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर वडिलांना फोन आलेल्या फोन नंबरवरुन पोलिसांनी माहिती घेतली असता गावातील फोनवरुन फोन येत नसल्याची माहिती मिळाली. दरम्यान, आरोपी सागर गायकवाड हा यशला आजीकडे ठेवून पोलिसांसमोरच निर्धास्तपणे फिरत होता. तेव्हा संशयावरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर आधी त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच आपणच मुलाचं पैशांसाठी अपहरण केल्याची कबुली त्याने दिली.

त्यानंतर पोलिसांनी सागरला अटक केली आणि दीपकची सुटका करुन त्याला त्याच्या पालकांकडे सोपवलं. अवघ्या 18 तासात पोलिसांनी अपहरणाचं हे प्रकरण सोडवत एका मुलाला त्याच्या आई-वडिलांना परत केल्याने कोळी परिवारांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते. पोलिसांच्या या कामगिरीचं शहरात कौतुक होत आहे.

Solapur Police Solve Kidnapping Case

संबंधित बातम्या :

नागपुरात दोन दिवसात तीन हत्या, शहरात खळबळ

उंबरगावमधील खाद्यतेल व्यापाऱ्याची हत्या; मृतदेह कुर्झे धरणात आढळला

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.