AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11th Admissions: अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज! 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्ण करावा लागणार, कटऑफ 99 पर्यंत जाण्याची शक्यता

यामुळे पहिल्या यादीत मोठी चुरस होईल आणि कट ऑफ मोठ्या प्रमाणात वाढून 95 ते 99 पर्यंत जाईल अशी शक्यता आहे. बुधवारी जाहीर होणाऱ्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्ण करावा लागणार आहे.

11th Admissions: अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज! 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्ण करावा लागणार, कटऑफ 99 पर्यंत जाण्याची शक्यता
11th Admission Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 03, 2022 | 11:00 AM
Share

मुंबई : अकरावी प्रवेशाची (11th Admission) पहिली यादी आज बुधवारी (दि. 3) जाहीर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कटऑफ वाढणार की घटणार याकडे लक्ष लागले आहे. या यादीत पात्र ठरलेल्या 2 लाख 47 हजार विद्याथ्यांपैकी किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार याकडे लक्ष लागले आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्ण करावे लागणार आहेत. यंदा गुणवंताची संख्या जास्त असल्याने बहुतांश गुणवंत विद्यार्थ्यांनी (11th Students) नामवंत महाविद्यालयांचे पसंतीक्रम निवडण्याची शक्यता आहे. यामुळे पहिल्या यादीत मोठी चुरस होईल आणि कट ऑफ मोठ्या प्रमाणात वाढून 95 ते 99 पर्यंत जाईल अशी शक्यता आहे. बुधवारी जाहीर होणाऱ्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्ण (Admission) करावा लागणार आहे.

पहिल्या यादीत चुरस होण्याची शक्यता

मुंबईत अकरावी प्रवेशात 1 हजार 15 महाविद्यालयांत 3 लाख ६२ हजार ७५९ जागा आहेत. या जागांवर प्रवेशासाठी तब्बल ३ लाख ८ हजार ७२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २ लाख ४७ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज यादीसाठी अंतिम आहेत. मुंबईतील नामवंत महाविद्यालयांतील जागा मिळवण्यासाठी टॉपर्स विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस होते. यामुळे पहिल्या यादीत चुरस होण्याची शक्यता आहे. ९५ ते १०० टक्के गुण मिळवलेल्या सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. ३० ऑगस्ट रोजी ज्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज पसंतीक्रम भरून अंतिम केले आहेत, अशा विद्यार्थ्यांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्याबरोबर आयसीएसई आणि सीबीएसई विद्यार्थ्यांनाही यावर्षी ९० टक्केहून अधिक गुण आहेत. यामुळे या यादीत मोठी चुरस होण्याची शक्यता प्राचार्य व्यक्त करत आहेत.

…तर त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाणार

3 ऑगस्टच्या पहिल्या प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांना 6 ऑगस्ट पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. जर मिळालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर ते पुढील फेरीची वाट पाहू शकणार आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे विद्यालय मिळालेले आहे. त्यांनी तेथे प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किवा प्रवेश नाकारला गेला, तर त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाणार आहे यामुळे कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीपर्यंत प्रवेशासाठी धडपड करावी लागणार आहे. जर पालकांनी पसंतीक्रम देताना गुण आणि महाविद्यालयातील कटऑफ याचा ताळमेळ बसवला असल्यास पहिल्या यादीत प्रवेश मिळतील असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.