AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11th Admissions: अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज! 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्ण करावा लागणार, कटऑफ 99 पर्यंत जाण्याची शक्यता

यामुळे पहिल्या यादीत मोठी चुरस होईल आणि कट ऑफ मोठ्या प्रमाणात वाढून 95 ते 99 पर्यंत जाईल अशी शक्यता आहे. बुधवारी जाहीर होणाऱ्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्ण करावा लागणार आहे.

11th Admissions: अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज! 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्ण करावा लागणार, कटऑफ 99 पर्यंत जाण्याची शक्यता
11th Admission Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 03, 2022 | 11:00 AM
Share

मुंबई : अकरावी प्रवेशाची (11th Admission) पहिली यादी आज बुधवारी (दि. 3) जाहीर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कटऑफ वाढणार की घटणार याकडे लक्ष लागले आहे. या यादीत पात्र ठरलेल्या 2 लाख 47 हजार विद्याथ्यांपैकी किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार याकडे लक्ष लागले आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्ण करावे लागणार आहेत. यंदा गुणवंताची संख्या जास्त असल्याने बहुतांश गुणवंत विद्यार्थ्यांनी (11th Students) नामवंत महाविद्यालयांचे पसंतीक्रम निवडण्याची शक्यता आहे. यामुळे पहिल्या यादीत मोठी चुरस होईल आणि कट ऑफ मोठ्या प्रमाणात वाढून 95 ते 99 पर्यंत जाईल अशी शक्यता आहे. बुधवारी जाहीर होणाऱ्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश पूर्ण (Admission) करावा लागणार आहे.

पहिल्या यादीत चुरस होण्याची शक्यता

मुंबईत अकरावी प्रवेशात 1 हजार 15 महाविद्यालयांत 3 लाख ६२ हजार ७५९ जागा आहेत. या जागांवर प्रवेशासाठी तब्बल ३ लाख ८ हजार ७२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २ लाख ४७ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज यादीसाठी अंतिम आहेत. मुंबईतील नामवंत महाविद्यालयांतील जागा मिळवण्यासाठी टॉपर्स विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस होते. यामुळे पहिल्या यादीत चुरस होण्याची शक्यता आहे. ९५ ते १०० टक्के गुण मिळवलेल्या सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. ३० ऑगस्ट रोजी ज्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज पसंतीक्रम भरून अंतिम केले आहेत, अशा विद्यार्थ्यांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्याबरोबर आयसीएसई आणि सीबीएसई विद्यार्थ्यांनाही यावर्षी ९० टक्केहून अधिक गुण आहेत. यामुळे या यादीत मोठी चुरस होण्याची शक्यता प्राचार्य व्यक्त करत आहेत.

…तर त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाणार

3 ऑगस्टच्या पहिल्या प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांना 6 ऑगस्ट पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. जर मिळालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर ते पुढील फेरीची वाट पाहू शकणार आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे विद्यालय मिळालेले आहे. त्यांनी तेथे प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किवा प्रवेश नाकारला गेला, तर त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाणार आहे यामुळे कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीपर्यंत प्रवेशासाठी धडपड करावी लागणार आहे. जर पालकांनी पसंतीक्रम देताना गुण आणि महाविद्यालयातील कटऑफ याचा ताळमेळ बसवला असल्यास पहिल्या यादीत प्रवेश मिळतील असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे.

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.