AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुक्त गावं कोरोनाग्रस्त होऊ शकतात, शाळा सुरु करण्याचं धाडस करण्यापूर्वी विचार करावा: बच्चू कडू

कोरोनामुक्त गावं कोरोनाग्रस्त होऊ शकतात त्यामुळे शाळा सुरु करण्याचं धाडस करताना विचार करावा लागेल, असं बच्चू कडू म्हणाले. Bacchu Kadu

कोरोनामुक्त गावं कोरोनाग्रस्त होऊ शकतात, शाळा सुरु करण्याचं धाडस करण्यापूर्वी विचार करावा: बच्चू कडू
बच्चू कडू, राज्यमंत्री
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 10:45 AM
Share

अमरावती: शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु करण्याबाबत मोठं विधान केलं आहे. कोरोनामुक्त गावांमध्ये 10 आणि 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत शक्यता तपासण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. मात्र, कोरोनामुक्त गावं कोरोनाग्रस्त होऊ शकतात त्यामुळे शाळा सुरु करण्याचं धाडस करताना विचार करावा लागेल, असं बच्चू कडू म्हणाले. (Bacchu Kadu said students health is important in Corona)

कोरोनामुक्त गाव कोरोनाग्रस्त होऊ शकते

कोरोनामुळे शाळा व महाविद्यालये गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत. आता शाळा कशा सुरू होणार व केव्हा सुरू होणार ही प्रतीक्षा पालकांसह विद्यार्थ्यांना लागली आहे.शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महत्त्वाचे विधान केलंय. जे गाव कोरोना मुक्त तेथे शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे, मात्र कोरोना मुक्त गाव जरी असलं तरी ते गाव कोरोना ग्रस्त होऊ शकते त्यामुळे त्याची भीती आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

माणूस महत्वाचा आरोग्य महत्वाचं

बच्चू कडू यांनी कोरोना संकटाच्या काळात माणूस महत्वाचा आहे,आरोग्य महत्त्वाचे आहे. शिक्षण कशा पद्धतीने सुरू करता येईल हा सर्वांसमोर प्रश्न आहे. मात्र, शाळा सुरू करताना मोठं धाडस करावं लागेल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलीय.

शिक्षण आजचं उद्या घेता येईल

कोरोनाचं संकट मोठं आहे. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचं आरोग्य महत्त्वाचं आहे. शिक्षण आजचं उद्या घेता येईल, मात्र विद्यार्थ्यांचं आरोग्य महत्वाचं आहे, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.

10 वी आणि 12 वीचे वर्ग सुरु करण्याची शक्यता तपासण्याचे आदेश

जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता 10/12 वी चे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पहावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 जून रोजी दिले होते.

संबंधित बातम्या:

कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण मोफत होणार, सरकार लवकरच निर्णय घेणार; वर्षा गायकवाड यांची माहिती

कोरोनामुक्त गावात दहावी- बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

(Bacchu Kadu said students health is important in Corona)

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.