AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुक्त गावं कोरोनाग्रस्त होऊ शकतात, शाळा सुरु करण्याचं धाडस करण्यापूर्वी विचार करावा: बच्चू कडू

कोरोनामुक्त गावं कोरोनाग्रस्त होऊ शकतात त्यामुळे शाळा सुरु करण्याचं धाडस करताना विचार करावा लागेल, असं बच्चू कडू म्हणाले. Bacchu Kadu

कोरोनामुक्त गावं कोरोनाग्रस्त होऊ शकतात, शाळा सुरु करण्याचं धाडस करण्यापूर्वी विचार करावा: बच्चू कडू
बच्चू कडू, राज्यमंत्री
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 10:45 AM
Share

अमरावती: शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु करण्याबाबत मोठं विधान केलं आहे. कोरोनामुक्त गावांमध्ये 10 आणि 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत शक्यता तपासण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. मात्र, कोरोनामुक्त गावं कोरोनाग्रस्त होऊ शकतात त्यामुळे शाळा सुरु करण्याचं धाडस करताना विचार करावा लागेल, असं बच्चू कडू म्हणाले. (Bacchu Kadu said students health is important in Corona)

कोरोनामुक्त गाव कोरोनाग्रस्त होऊ शकते

कोरोनामुळे शाळा व महाविद्यालये गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत. आता शाळा कशा सुरू होणार व केव्हा सुरू होणार ही प्रतीक्षा पालकांसह विद्यार्थ्यांना लागली आहे.शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महत्त्वाचे विधान केलंय. जे गाव कोरोना मुक्त तेथे शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे, मात्र कोरोना मुक्त गाव जरी असलं तरी ते गाव कोरोना ग्रस्त होऊ शकते त्यामुळे त्याची भीती आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

माणूस महत्वाचा आरोग्य महत्वाचं

बच्चू कडू यांनी कोरोना संकटाच्या काळात माणूस महत्वाचा आहे,आरोग्य महत्त्वाचे आहे. शिक्षण कशा पद्धतीने सुरू करता येईल हा सर्वांसमोर प्रश्न आहे. मात्र, शाळा सुरू करताना मोठं धाडस करावं लागेल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलीय.

शिक्षण आजचं उद्या घेता येईल

कोरोनाचं संकट मोठं आहे. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचं आरोग्य महत्त्वाचं आहे. शिक्षण आजचं उद्या घेता येईल, मात्र विद्यार्थ्यांचं आरोग्य महत्वाचं आहे, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.

10 वी आणि 12 वीचे वर्ग सुरु करण्याची शक्यता तपासण्याचे आदेश

जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता 10/12 वी चे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पहावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 जून रोजी दिले होते.

संबंधित बातम्या:

कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण मोफत होणार, सरकार लवकरच निर्णय घेणार; वर्षा गायकवाड यांची माहिती

कोरोनामुक्त गावात दहावी- बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

(Bacchu Kadu said students health is important in Corona)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.