AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावी परीक्षेबद्दल बोर्डाचा अत्यंत मोठा निर्णय, थेट दहावीची परीक्षा आता वर्षातून…

राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली असून यादरम्यान अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला. सीबीएसईकडून याबाबत खुलासा करण्यात आला. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतली जाणार आहे.

दहावी परीक्षेबद्दल बोर्डाचा अत्यंत मोठा निर्णय, थेट दहावीची परीक्षा आता वर्षातून...
10th exam
| Updated on: Feb 20, 2026 | 1:21 PM
Share

राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून प्रशासनाकडून मार्गदर्शन केले जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 10 वीची परीक्षा आजपासून सुरू झाली. 20 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत परीक्षा सुरू असेल. आज विद्यार्थ्यांचा पहिला पेपर आहे. राज्यातील एकूण 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. प्रशासनाकडून या परीक्षेची जय्यत तयारी करण्यात आली. अनेक भरारी पथके तयार करण्यात आली असून कॉपी मुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाचा भर आहे. काही केंद्रांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. अगोदरच शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले की, कॉपी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. आता दहावीच्या परीक्षेबाबत अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे.

Central Board of Secondary Education (CBSE) ने दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक अत्यंत मोठा निर्णय नक्कीच म्हणावा लागेल. दहावीची पहिली परीक्षा सक्तीची न दिल्यास दुसरी संधी मिळणार नसल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले. पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही.

किमान तीन विषय न दिल्यास विद्यार्थ्यांना ‘एसेंशियल रिपीट’ श्रेणीत ठेवून पुढील वर्षी मुख्य परीक्षेला बसावे लागेल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्याची संधी असेल. नियमात कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट करण्यात आले. म्हणजेच थोडक्यात काय तर विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची पळ वाट शोधता येणार नाही.

सीबीएसईकडून वर्षातून दोनदा परीक्षा घेतली जाणार ही वस्तूस्थिती असली तरीही पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्याला दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नसल्याचे स्पष्ट आहे. हा मोठा निर्णय बोर्डाने घेतला आहे. एसेंशियल रिपीट श्रेणीत ठेवून पुढील वर्षी मुख्य परीक्षेला बसावे लागेल. बोर्डाने यावर आता भूमिका स्पष्ट केली आहे. वर्षातून दोनदा दहावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय बोर्डाने नक्कीच घेतला आहे. मात्र, नक्की कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येईल हे स्पष्ट केले.

Follow Us
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?.
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा.
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?.
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप.
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.