AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11th Admissions: अकरावी प्रवेश प्रक्रिया ठप्प! विद्यार्थ्यांना सामान न्याय मिळावा म्हणून शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

11th Admissions: या निकालाची वाट पाहत होता पण काल काही कारणास्तव हा निकाल जाहीर झाला नाही. निकालाची कुठलीही अधिकृत माहिती अद्याप हाती आलेली नाही

11th Admissions: अकरावी प्रवेश प्रक्रिया ठप्प! विद्यार्थ्यांना सामान न्याय मिळावा म्हणून शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
NEET PG allotmentImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 05, 2022 | 8:24 AM
Share

पुणे: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (Mahrashtra Board SSC Results) लागून पंधरा दिवस उलटलेत. आता सगळं लक्ष लागून आहे ते म्हणजे सीबीएसई दहावीच्या निकालाकडे. या निकालाकडे महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांचं देखील लक्ष लागून आहे त्याला कारण म्हणजे अकरावी प्रवेश! अकरावी प्रवेश प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होणार आहे जेव्हा अन्य बोर्डाच्या दहावीचा निकाल लागणार आहे. काल सीबीएसईच्या दहावीचा निकाल (CBSE 10th Results 2022) लागेल अशी शक्यता वर्तविली जात होती. विद्यार्थी आणि पालकवर्ग आतुरतेने या निकालाची वाट पाहत होता पण काल काही कारणास्तव हा निकाल जाहीर झाला नाही. निकालाची कुठलीही अधिकृत माहिती अद्याप हाती आलेली नाही पण सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर झाल्यावरच अकरावीच्या प्रवेशाची (11th Admissions) पुढील प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने केलं स्पष्ट केलंय. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली माहिती

विद्यार्थ्यांना समान न्याय मिळावा यासाठी निर्णय

राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर करून जवळपास पंधरा दिवस झालेयंदा प्रथमच राज्य मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल सीबीएसईच्या आधी जाहीर केला तरी अकरावीची प्रवेश प्रक्रिया ठप्प झालेली आहे. त्यामुळे पालकवर्ग चिंतीत आहे. आयजीसीएसई आणि एनआयओएस वगळता अन्य शिक्षण मंडळांचे दहावीचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. दरवर्षी अकरावीच्या राज्य मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण प्रवेशांपैकी पाच टक्के विद्यार्थी सीबीएसईचे असतात. आकडा तसा गृहीत धरण्यासारखाच असल्यानं सगळ्याच विद्यार्थ्यांना समान न्याय मिळावा यासाठी शासनाने प्रवेश प्रक्रियेसाठी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतलाय.

अकरावी प्रवेशाचे ठळक मुद्दे

  • यंदा नियमित प्रवेशफेऱ्या आणि विशेष फेरीनंतरही प्रवेश न मिळालेल्या तसेच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त विशेष फेरी राबविण्यात येणार आहे.
  • नियमित फेरीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी शून्य फेरी घेतली जाणार असून या फेरीत प्रवेश होणार नसले तरी गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.
  • मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होतात. शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या प्रवेशाची सुरुवात झाली असून आतापर्यंत मुंबई विभागातून 2 लाख 40 हजार 569 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
  • लवकरच कॉलेज पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होणार असून शून्य फेरीवेळी विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीसाठी प्रवेश अर्ज भरणे, कॉलेज पसंतीक्रम नोंदविता येणार आहे.
  • पुनर्परीक्षार्थी, खासगी तसेच श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन जुलैमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
  • विद्यार्थी नियमित परीक्षा शुल्कासह 30 जूनपर्यंत अर्ज भरू शकतात
  • 1 जुलैपासून ते 4 जुलैपर्यंत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे.
  • विद्यार्थी www.mahahsscboard.in या वेबसाईटवर ऑनलाइन परीक्षा अर्ज भरू शकतात
Follow Us
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.