AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC HSC Exams 2021 : वर्षा गायकवाडांनी ठासून सांगितलं, काठिण्य पातळी गौण, आमची तयारी झालीय!

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी विधानसभेत ठणकावून (Maharashtra Vidhan Sabha) सांगितलं.

SSC HSC Exams 2021 : वर्षा गायकवाडांनी ठासून सांगितलं, काठिण्य पातळी गौण, आमची तयारी झालीय!
वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री
| Updated on: Mar 05, 2021 | 1:50 PM
Share

SSC HSC Exams 2021 मुंबई : यावर्षी परीक्षा होणारच आहे, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी विधानसभेत ठणकावून (Maharashtra Vidhan Sabha) सांगितलं. आमची प्राथमिकता मुलांच्या आरोग्याला आहे. त्यामुळे सर्व काळजी घेऊनच आम्ही परीक्षा घेणार आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. दहावीच्या, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन घेतली होती. दोन महिने दहावी, बारावीच्या प्रश्नपत्रिका वितरणासाठी लागतात, त्यामुळे ती प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. त्यामुळे काठिण्य पातळीबाबत उपस्थित केलेला मुद्दा आता गौण आहे. भौगोलिक स्थिती बघून आपण टाईमटेबल ठरवलं आहे, असं वर्षा गायकवाड विधानसभेत म्हणाल्या.

दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी कालही याबाबत सविस्तर माहिती दिली होती. “ऑगस्टला आम्ही सिलॅबस कमी करून नोव्हेंबरमध्ये बोर्डाचा पेपर पॅटर्न ठरतो, त्याची तपासणी करायचं ठरतं. त्यात गावखेड्यात पेपर पोहोचवायला कमीत कमी दोन महिने लागतात. हे सगळं करत असताना बोर्डाला सुद्धा वेळ लागतो, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

परीक्षा ऑफलाईनच होणार

याबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या, “कोरोनाची परिस्थिती आहे त्यात मुलांचं आरोग्य, सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. खूप साऱ्या तज्ज्ञांशी शिक्षण विभाग बोलत आहे. सध्यातरी जी दहावी-बारावी बोर्डाची तारीख दिली आहे त्यानुसारच परीक्षा या ऑफलाईनच होणार आहे”

ऑगस्टला आम्ही सिलॅबस कमी करून नोव्हेंबरमध्ये बोर्डाचा पेपर पॅटर्न ठरतो, त्याची तपासणी करायचं ठरतं. त्यात गावखेड्यात पेपर पोहोचवायला कमीत कमी दोन महिने लागतात. हे सगळं करत असताना बोर्डाला सुद्धा वेळ लागतो.

बोर्ड परीक्षा पॅटर्नबाबत मागणी केली जातीय ? याबाबत निर्णय घेणार ?

बोर्डाच्या परीक्षांबाबत सूचना, मागण्या काही लोकांनी दिल्या आहेत. मात्र,पेपर पॅटर्न आणि त्यानुसार मार्क्स असतात आणि पेपर त्यानुसार तयार केलेले असतात. त्यात काही गोष्टींची आवश्यकता असेल तर तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

संबंधित बातम्या  

EXCLUSIVE : दहावी- बारावी बोर्ड परीक्षांबाबत काय विचार केला जातोय?

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.