AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत सरकारची “मोफत लॅपटॉप वाटप” योजना! काय आहे हा मेसेज?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक टेक्स्ट मेसेज व्हायरल होतोय, ज्यात भारत सरकारला 5 लाख मोफत लॅपटॉप वितरित करण्याच्या योजनेबद्दल सांगण्यात आलं असल्याचं म्हटलं जातंय.

भारत सरकारची मोफत लॅपटॉप वाटप योजना! काय आहे हा मेसेज?
Free laptop schemeImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 20, 2022 | 5:31 PM
Share

अनेक राज्य सरकारे विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप योजना राबवतात. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसह अनेक प्रकारच्या योजनाही केंद्र सरकारकडून चालवल्या जातात. आता भारत सरकार देशभरातील 5 लाख विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप योजना आणत असल्याची चर्चा होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय 5 लाख विद्यार्थ्यांना लॅपटॉप मोफत देणार असल्याचा संदेश सगळीकडे पसरविला जातोय. या मेसेजमध्ये फ्री लॅपटॉपची लिंकही देण्यात आली आहे. विद्यार्थी हा संदेश वाचून जाम खुश होतायत. या मेसेजबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता पीआयबीने याचं उत्तर दिलेलं आहे.

खरं तर गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक टेक्स्ट मेसेज व्हायरल होतोय, ज्यात भारत सरकारला 5 लाख मोफत लॅपटॉप वितरित करण्याच्या योजनेबद्दल सांगण्यात आलं असल्याचं म्हटलं जातंय.

त्या सोशल मीडिया व्हायरल मेसेजमध्ये लिहिले आहे की- ‘केंद्रीय शिक्षण मंत्रालय विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉपचे वाटप करत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत करण्यासाठी आणि मुलांना ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आपण या विनामूल्य लॅपटॉपसाठी पात्र आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा.”

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) @PIBFactCheck आपल्या फॅक्ट चेक ट्विटर हँडलवर या व्हायरल मेसेजची सत्यता सांगितलीये.

सोशल मीडियावर जो मेसेज पसरवला जात आहे, तो फेक असल्याचं ट्वीटमध्ये सांगण्यात आलं आहे. भारत सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नाहीये.

अशा मेसेजसह येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याची चूक करू नका. अशी चूक करून तुम्ही ऑनलाइन फ्रॉडचे शिकारही होऊ शकता.

भारत सरकारच्या कोणत्याही योजनेसंदर्भात संपूर्ण माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळांना भेट द्या. याशिवाय पीआयबीला 8799711259 मेसेज पाठवून किंवा socialmedia@pib.gov.in ईमेल करून व्हायरल मेसेजची सत्यताही तुम्ही जाणून घेऊ शकता.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.