AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेतील फिजिक्स केमिस्ट्री, मॅथ्सची प्रश्नपत्रिका जाहीर, निकाल कधी लागणार?

जेईई अ‌ॅडव्हान्सड 2021 भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयाची प्रश्न पत्रिका आज जारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या उत्तरांची प्रत उद्या 5 ऑक्टोबर 2021 पासून उपलब्ध होईल.

JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेतील फिजिक्स केमिस्ट्री, मॅथ्सची प्रश्नपत्रिका जाहीर,  निकाल कधी लागणार?
विद्यार्थी
| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 7:04 PM
Share

JEE Advanced 2021 नवी दिल्ली: संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा रविवारी घेण्यात आली आहे. ही परीक्षा भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IITs) अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर आणि नियोजन कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली गेली. जेईई अ‌ॅडव्हान्सड 2021 भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयाची प्रश्न पत्रिका आज जारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या उत्तरांची प्रत उद्या 5 ऑक्टोबर 2021 पासून उपलब्ध होईल. जे विद्यार्थी परीक्षेला बसले होते ते अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in त्यांनी नोंदवलेली उत्तर पाहू शकतात. जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेत दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. प्राथमिक उत्तर तालिका 10 ऑक्टोबर रोजी जारी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत आक्षेप सादर करण्याची संधी असेल.

अंतिम निकाल 15 ऑक्टोबरला

जेईई अॅडव्हान्स्ड 2021 परीक्षेची अंतिम उत्तर तालिका आणि निकाल 15 ऑक्टोबर 2021 रोजी जाहीर केला जाईल. जेईई मेन 2021 परीक्षा उत्तीर्ण करणारे 2.5 लाख विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड 2021 परीक्षेसाठी पात्र असतात. देशातील आयआयटी संस्थातील प्रवेशासाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. परीक्षेपासून निकालापर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

परीक्षेचा तपशील

जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा या वर्षी आयआयटी खरगपूरतर्फे 630 परीक्षा केंद्रावर घेतली गेली आहे. गेल्या वर्षी, जेईई मेन उत्तीर्ण झालेल्या 2,50,621 उमेदवारांपैकी 1,60,838 ने जेईई प्रगत साठी नोंदणी केली होती. यातील 1,50,838 विद्यार्थ्यांपैकी 43,204 उमेदवार दोन्ही पेपरसाठी पात्र ठरले होते.

जेईई ॲडव्हान्सड नेमकी काय?

जॉइंट एंट्रन्स एक्झाम मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेले अडीच लाख विद्यार्थी जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करतात. जेईई ॲडव्हान्स्ड 2 पेपर्स मध्ये घेतली जाते. पहिला पेपर सकाळी 9 ते 12 तर दुसरा पेपर 2.30 ते 5.30 या वेळेत घेतला गेला

जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्सड परीक्षेनंतर कुठे प्रवेश मिळतो?

जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्सडपरीक्षे नंतर देशातील आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश घेता येतो. यामध्ये बॅचलर्स, इंटिग्रेटेड, मास्टर्स डिग्री कोर्स अशा अभ्यासक्रमांना जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश मिळतो. आयआयटी खरगपूर, आयआयटी कानपूर, आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रास, आयआयटी बॉम्बे, या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

इतर बातम्या:

JEE Advanced 2021 : जेईई ॲडव्हान्सड परीक्षेची 630 परीक्षा केंद्रावर जय्यत तयारी, विद्यार्थ्यांसाठी नियमावली जाहीर

JEE Advanced 2021 exam pcm question paper released answer response display tomorrow on jeeadv ac in

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.