Junior College Admission : बारावीला कॉलेज बदलताना ‘हा’ नियम पाळावा लागणार !

दहावी नंतर कुठल्याही कॉलेजला प्रवेश घेताना तो प्रवेश दहावीच्या मार्कांवर अवलंबून असायचा त्यामुळे विद्यार्थ्यांना बरेचदा हवं ते कॉलेज मिळत नसायचं. 11वी (11th) मिळालेल्या कॉलेजात काढायची आणि बारावीला हव्या असलेल्या कॉलेजात डोनेशन भरून प्रवेश घ्यायचा अशी पद्धत रीतसर सुरु असायची.

Junior College Admission : बारावीला कॉलेज बदलताना 'हा' नियम पाळावा लागणार !
बारावीला कॉलेज बदलताना 'हा' नियम पाळावा लागणार !Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 12:04 PM

मुंबई: बारावीला आता आपल्या पसंतीचं कॉलेज घ्यायचं असेल तर त्यासाठी आता शिक्षण उपसंचालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळं बारावीला हवं ते कॉलेज (Junior College) आता विद्यार्थ्यांना थोडं अडचणीचं ठरणार आहे. दहावी नंतर कुठल्याही कॉलेजला प्रवेश घेताना तो प्रवेश दहावीच्या मार्कांवर अवलंबून असायचा त्यामुळे विद्यार्थ्यांना बरेचदा हवं ते कॉलेज मिळत नसायचं. 11वी मिळालेल्या कॉलेजात काढायची आणि बारावीला हव्या असलेल्या कॉलेजात डोनेशन (Donation) भरून प्रवेश घ्यायचा अशी पद्धत रीतसर सुरु असायची. या सगळ्याला आळा घालण्यासाठी आता बारावीत कॉलेज बदलून घेण्यासाठी शिक्षण उपसंचालकांची परवानगी घेण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. याशिवाय आता बारावीला (12th) कॉलेज बदलताना कारण सुद्धा रास्त लागणार आहे. ठराविक कारणांसाठीच कॉलेज बदलायची मुभा आता मिळणार आहे.

ना हरकत प्रमाणपत्र

विद्यार्थ्यांना अडचण असल्यास जे कॉलेज हवं असेल त्या कॉलेजकडून ना हरकत प्रमाणपत्र तसंच कॉलेज बदलासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाची मान्यता आणि नेमकं कारण (रास्त कारण) असेल तरच विद्यार्थ्याला कॉलेज बदलायची परवानगी मिळणार आहे. बारावी प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाला पाठवणं आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

कारणं पडताळून घेऊनच विद्यार्थ्यांना प्रवेश

सध्या विद्यार्थी शिक्षण घेत असलेलं कॉलेज घरापासून लांब असणं, पालकांची बदली होणे, वैद्यकीय कारणास्तव परिसरातलं कॉलेज मिळणे, शाखा बदलून मिळणे, विद्यर्थ्यांचा राहण्याचा पत्ता बदलणे, बारावीमध्ये विद्यार्थ्याला बोर्ड बदलून घ्यायचा असेल तर अशा कारणांसाठी पूर्वी बारावीमध्ये कॉलेज बदलून मिळत असे. पण बारावीला कॉलेज बदलून घेण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे त्यामुळे आता ही कारणं पडताळून घेऊनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.