AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra School Reopen : मुंबई पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपासून करण्याचा निर्णय परिस्थिती पाहूनच घेऊ : वर्षा गायकवाड

मुंबई पुण्यातील परिस्थिती पाहूनचं शाळेचा निर्णय घेतला जाईल. ओमिक्रॉनच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

Maharashtra School Reopen : मुंबई पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपासून करण्याचा निर्णय परिस्थिती पाहूनच घेऊ : वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 1:42 PM
Share

मुंबई: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मुंबई पुण्यातील (Mumbai Pune ) परिस्थिती पाहूनचं 15 डिसेंबरपासून शाळेचा निर्णय घेतला जाईल असं म्हटलं. ओमिक्रॉनच्या (Omicron) परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. राज्य सरकारनं 1 डिसेंबरपासून शाळा सुरु केल्यानंतर मुंबई पुण्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला होता. आता ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याबाबत काय निर्णय होणार हे येत्या काही दिवसांमध्ये समोर येईल.

मुंबई पुण्यातील परिस्थिती पाहून निर्णय

वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करण्यासाठी आम्ही नियमावली टास्क फोर्सशी चर्चा करुन बनवली असल्याचं म्हटलं. आम्ही शाळांसाठी अनेक बारीक गोष्टींचा विचार करुन नियमावली बनवली आहे. मुंबई पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय़ घेतला जाईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

15 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याबाबत आढाव घेऊन निर्णय

राज्यातील ग्रामीण भागात 1 डिसेंबरपासून शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र, पुणे आणि मुंबईतल्या शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. आता मुंबई आणि पुणे, कल्याण डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळं शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय परिस्थितीचा आढावा घेऊन घेण्यात येईल.

ओमिक्रॉनचे राज्यात दहा रुग्ण

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन वेरिएंटनं राज्यात प्रवेश केला आहे. कल्याण डोंबिवलीत 1, पिंपरीमध्ये 6, पुण्यात 1 आणि मुंबईत 2 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ओमिक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि शालेय शिक्षण विभाग काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. मुंबई विभागातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. अद्याप त्या निर्णयात बदल झाला नसल्याचं मुंबई महापालिकेचे अधिकारी राजू तडवी यांनी सांगितलं आहे. मुंबई, पुणे आणि डोंबिवलीतील वाढत्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य यांचा विचार करुन निर्णय घेऊ, असं तडवी म्हणाले.

इतर बातम्या

Ashish Shelar: मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पात घोटाळा; मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर शेलारांचा गंभीर आरोप

Worli Gas Cylinder Blast : उत्तर प्रदेशातील घटनेवेळी कुठे गेली होती संवेदना? पेडणेकरांचा शेलारांना टोला

Maharashtra Education Minister Varsha Gaikwad said school reopen in mumbai pune start after review of corona and omicron conditions and discussions with CM and Task Force

Follow Us
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...
ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; काँग्रेसची सावध भूमिका
ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; काँग्रेसची सावध भूमिका.
मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल
मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल.
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल...
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल....