AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane School Reopen : ठाण्यातील शाळा आजपासून सुरु, ग्रामीण सह शहरी भागातील शाळा विद्यार्थ्यांनी गजबजणार

आजपासून ठाण्याच्या ग्रामीण भागातील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आजपासून सुरु होणार आहेत. राज्य सरकारनं जारी केलेल्या नियमावलीनुसार शाळा सुरु करण्यात येणार आहेत.

Thane School Reopen : ठाण्यातील शाळा आजपासून सुरु, ग्रामीण सह शहरी भागातील शाळा विद्यार्थ्यांनी गजबजणार
School Reopen
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 15, 2021 | 10:13 AM
Share

ठाणे: जिल्ह्यातील (Thane School  Reopen) ग्रामीण भागातील 987 शाळा आणि शहरी भागातील शाळा देखील आजपासून सुरू होणार आहेत. ग्रामीण भागातील पाचवी पासूनचे पुढील इयत्तांचे वर्ग यापूर्वीचं सुरु करण्यात आले होते. आजपासून ठाण्याच्या ग्रामीण भागातील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आजपासून सुरु होणार आहेत. राज्य सरकारनं (Maharashtra Government) जारी केलेल्या नियमावलीनुसार शाळा सुरु करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता.

ग्रामीण सोबतच शहरी भागातील शाळा सुरु होणार

ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणेचं ठाणे शहरातही पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरु होत आहेत.

शाळा सुरु करताना या नियमांचं पालन करावं लागणार

  1. पालकांचं संमतीपत्र आवश्यक
  2. ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार
  3. एका बेंचवर एक विद्यार्थी
  4. शाळा 3 ते 4 तास सुरु
  5. गृहपाठावर भर
  6. सांघिक खेळ खेळण्यास मनाई
  7. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं लसीकरण आवश्यक
  8. सॅनिटायझेशन, हात धुण्याची सोय आवश्यक

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून 1 डिसेंबर रोजी शाळा सुरु करण्याचा आदेश 29 नोव्हेंबरला काढण्यात आला होता. त्यामध्ये देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

कल्याण डोंबिवलीतील शाळांबाबत दोन दिवसात निर्णय

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत राज्यातील पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला होता. ठाण्याप्रमाणेचं तिथं देखील शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. कल्याण डोंबिवलीतील प्राथमिक शाळा सुरु करण्याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाणार आहे.

मुंबईत शाळा सुरु

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या शाळांची संख्या 3 हजार 420 आहे. या शाळांमधील विद्यार्थी संख्या साडे दहा लाख इतकी आहे. महापालिकेनं आजपासून पूर्ण क्षमतेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्यासंदर्भात जोरदार तयारी करण्यात आली आहे. या वेळी शाळा कोणत्याही स्थितीत सुरू केल्या जाणार असून यामध्ये तूर्तास कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण महापालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आले.

इतर बातम्या:

बार्टीच्या बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, ‘या’ दिवशी प्रवेश परीक्षा

Mumbai School Reopen: मुंबईत मराठी माध्यमांच्या शाळांची घंटा आजच वाजणार, कॉन्व्हेंट, इंग्रजी शाळांना नवा मुहूर्त

Thane School Reopen schools to reopen from today in rural and urban area check here for guidelines

Follow Us
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर नितेश राणेंची बोचरी टीका