AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UGC: CBSE 12वीचा निकाल लागण्याआधीच विद्यापीठांकडून प्रवेशाची अंतिम तारीख जाहीर! युजीसीचं विद्यापीठांना पत्रं

CBSE 12th Results: महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी अडचणी येत आहेत आणि सीबीएसई च्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेशाची अडचण येत आहे कारण काही विद्यापीठांनी प्रवेशाची अंतिम तारीख निश्चित केलेली आहे.

UGC: CBSE 12वीचा निकाल लागण्याआधीच विद्यापीठांकडून प्रवेशाची अंतिम तारीख जाहीर! युजीसीचं विद्यापीठांना पत्रं
CBSE 12 th ResultImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 15, 2022 | 1:33 PM
Share

सीबीएसई दहावी (CBSE 10th Result) आणि बारावी (CBSE 12th Result) दोन्हीचा निकाल येणं अजून बाकी आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी बारावीचा निकाल लागून बरेच दिवस झालेले आहेत. सीबीएसईच्या निकाल लवकर न लावल्याने विद्यार्थी पालक सगळ्यांचाच गोंधळ उडाला आहे आणि हा गोंधळ फक्त महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा नाही तर सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचाही उडालाय. अडचण दोन्हींना आहे, महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी अडचणी येत आहेत आणि सीबीएसई च्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेशाची अडचण येत आहे कारण काही विद्यापीठांनी प्रवेशाची अंतिम तारीख निश्चित केलेली आहे. त्यामुळे यूजीसीने (UGC) सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना सीबीएसईने इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर केल्यानंतर त्यांच्या पदवी प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख निश्चित करण्याची विनंती केली आहे.

विद्यापीठांनी आपली प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे

सीबीएसई 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांना पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अंतिम मुदत निश्चित करण्यास सांगितले आहे, अशी माहिती अध्यक्ष जगदेश कुमार यांनी दिली. सीबीएसईने अद्याप बारावीचा निकाल जाहीर केला नसला तरी काही विद्यापीठांनी आपली प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे, असे नमूद करून कुमार म्हणाले की, बोर्डाने निकाल जाहीर करण्यापूर्वी विद्यापीठांनी अंतिम तारीख निश्चित केली तर सीबीएसईचे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतील. ते म्हणाले, “यूजीसीने सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना सीबीएसईने इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर केल्यानंतर त्यांच्या पदवी प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख निश्चित करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून अशा विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पुरेसा वेळ मिळेल,” ते म्हणाले.

विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागेल- UGC

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) गेल्या आठवड्यात आयोगाशी संपर्क साधल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले असून विद्यापीठांना त्यांच्या निकालानुसार त्यांचे प्रवेशाचे वेळापत्रक निश्चित करण्यास सांगावे, अशी विनंती केली आहे. ‘काही विद्यापीठांनी 2022- 23 या सत्रासाठी पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये नोंदणी सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. या परिस्थितीत सीबीएसई निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यापीठांनी अंतिम तारीख निश्चित केल्यास सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागेल’ असे यूजीसीने कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

त्यामुळे अशा उमेदवारांना पुरेसा वेळ देण्यासाठी सीबीएसईचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व उच्च शिक्षण संस्थांनी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम तारीख निश्चित करावी, अशी विनंती करण्यात आली आहे,’ असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा निकाल महिनाअखेरपर्यंत जाहीर करण्याची शक्यता आहे. कोविड-19 महामारीमुळे यंदा बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक लांबणीवर पडले होते या कारणामुळे निकालही लांबणीवर पडलाय.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.